बंजारा समाजाचे युवा नेतृत्व वासुदेव राठोड बी.आर.एस च्या वाटेवर

किनवट–  माहूर तालुक्यातील नवतरुणांनाच नाहीतर वयवृद्ध मतदारांना सुद्धा आपल्या पक्षाच्या अनेक योजनेची भुरळ घातलेल्या भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष,तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा.के.चंद्रशेखर राव (के.सी.आर) आपल्या पक्षाचा मोर्चा आता महाराष्ट्र कडे वळवला असुन त्यांचे परसाद आता किनवट व माहूर तालुक्यात पडत अनेक तरुण कार्यकर्ते व विविध पक्षाचे नेते आता भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या वाटेवर जाताना दिसून येत आहे.दि.२६ मार्च २०२३ रोजी लोहा जिल्हा नांदेड येथे पक्षाकडून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला असुन अनेक तरूण या कार्यक्रमात पक्ष प्रवेश करणार आहे.

बंजारा समाजाचे युवा नेतृत्व गोर केसुला ग्रुपचे अध्यक्ष व वानोळा जिल्हा परिषद गटाचे युवा नेतृत्व वासुदेव राठोड (नाईक) हे सुद्धा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मध्ये पक्ष प्रवेश करणार असून यामुळे बंजारा समाजाचा मोठा गट भारत राष्ट्र समिती (बीआरएस) कडे वळेल यात शंका नाही.

jalgaonsandesh

jalgaonsandesh