काय सांगता! अर्ध्या गावाला अतिक्रमणाच्या नोटिसा, 186 कुटुंबांवर घर खाली करण्याची वेळ

शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली राज्यभरात सुरु असून, आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाखो अतिक्रमणधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अतिक्रमणधारकांना देखील अशाच नोटीसा देण्यात आल्या आहेत. पण याचवेळी पैठणखेडा या गावातील चक्क अर्ध्या गावाला शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कारण या जागांवर तब्बल 186 कुटुंबांचे घर बांधलेली आहे. ज्यात अनेक घरं शासकीय घरकुल योजनेमधून बांधण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच गटामध्ये जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीसुद्धा आहे.

पैठणखेडा येथील अर्ध्या गावाला अतिक्रमणाच्या नोटिसा आल्यामुळे येथे राहत असलेल्या 186 रहिवासी कुटुंबांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावालगतच असलेल्या गायरान गट क्र. 11 व 12 मध्ये राहणाऱ्या लोकांना ही नोटीस आली आहे. थेट अर्ध्या गावाला नोटीस आल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना विविध शासकीय बेघर, 1957 ते 1985 दरम्यान शासनानेच भूमिहीन, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय योजनेअंतर्गत समाजकल्याण विभाग, इंदिरा गांधी झोपडपट्टी व इंदिरा आवास योजनेअंतर्गत गावालगतच असलेल्या याच गायरान जमिनीवर जागा देण्यात आली होती असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या ठिकाणी गेली दोन पिढ्यांपासून नागरिक राहत आहे. पण आजवर या नागरिकांनी जागा दिल्याचा ना पुरावा मागितला ना तहसील कार्यालयानेही दिला. तहसीलमार्फत या नागरिकांना वैयक्तिक कठलेही जागेचे प्रमाणपत्र दिले नाही. परंतु, ग्रामपंचायतीमधील नोंदीनुसार तहसीलच्या आदेशानुसार या नागरिकांच्या घरांची नोंद 8 अ वर इतर अधिकार (भोगवटा) मध्ये घेण्यात आल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

शासकीय योजनेतून घरे बांधलेली…

याच ठिकाणी मागासवर्गीय कुटुंबाला शासनाने समाजकल्याण विभागांतर्गत 1962 मध्ये घरकुल बांधून दिल्याच नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तर, तर काही लोकांना 1957/76 मध्ये इंदिरा गांधी झोपडपट्टी योजनेअंतर्गत याच गटांत जागा, पत्रे, लाकडी खांब व बांधकामासाठी आर्थिक अनुदान दिले. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरे बांधून या घरकुलाचे लोकार्पण तत्कालीन गृहराज्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते.पण आता या लोकांना थेट नोटीसा मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

नोटीस रद्द करण्याची मागणी…

पैठणखेडा गावालगतच असलेल्या गायरान गट क्र. 11 व 12 मध्ये राहणाऱ्या लोकांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस देण्यात आली आहे. मात्र आज येथे राहत असलेल्या लोकांची दुसरी पिढी सुरू असून, कमवणारे हात वाढल्यामुळे आर्थिक परिस्थितीनुसार येथे आज सिमेंट काँक्रिटची पक्के घरे झाली आहे. शासकीय योजनेअंतर्गत येथील नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून आनंदाने राहत असलेल्या या लोकांना शासनाने पुन्हा बेघर करण्याच्या नोटिसा दिल्यामुळे येथील रहिवाशांची धडधड वाढली आहे. दिलेली नोटीस रद्द करून येथे राहत असलेल्या नागरिकांची घरे नियमित करावे, अशी मागणी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी तहसीदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण