आता 80 वर्षांवरील मतदारांना घरातूनच करता येणार मतदान

राज्य सरकारचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपणार आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तर मेच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात प्रथमच विधानसभा निवडणुकीवेळी 80 वर्षांवरील मतदारांना घरातूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

राज्य सरकारचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपणार आहे. तत्पूर्वी पारदर्शक आणि निर्भिडपणे निवडणूक घेण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि दिव्यांगांना घरातूनच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. मतदान केंद्रातही त्यांना विशेष व्यवस्था केली जाणार आहे. तरी सुद्धा मतदान केंद्रापर्यंत येऊन मतदान करणे शक्य न होणाऱ्यांना घरातूनच मतदान करण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे. सर्वांना मतदानाचा मतदानाच हक्क बजावता यावा, याकरिता हे पाऊल उचलण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

गुरुवारी राज्य दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने तीन दिवस विविध स्तरावर बैठका घेतल्या. मतदार जागृतीसंबंधी कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. शनिवारी नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी राजीव कुमार म्हणाले, तत्पूर्वी विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी कर्नाटकात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी विस्तृत चर्चा करून माहिती घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून निवडणूक प्रक्रियेच्या तयारीची माहिती जाणून घेतली आहे. त्याचप्रमाणे आवश्यक सूचना आणि सल्ले देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

राज्यात 31 महसूल जिल्हे असून 34 निवडणूक जिल्हे म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार कर्नाटकाची लोकसंख्या 6.1 कोटी इतकी आहे 224 विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातींसाठी 36 आणि अनुसूचित जमातींसाठी 15 मतदारसंघ राखीव आहेत.

राज्यात 5,21,76,579 मतदार

राज्यात 3 मार्च 2023 पर्यंत एकूण 5,21,76,579 मतदार आहेत. त्यामध्ये 2,62,42,561 महिला आणि 2,59,26,319 पुरुष मतदार आहेत. 80 वर्षांहून अधिक वयाचे 12,15,763 आणि शंभरी पार केलेले 16,976 मतदार आहेत. यावेळी 9,17241 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात सुमारे 42,756 तृतीयपंथी आहेत. त्यापैकी 41,312 जण मतदार आहेत, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

9.17 लाख जण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क

निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांमुळे यावेळी 9.17 लाख नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवाय अॅडव्हान्स अॅप्लिकेशन सुविधेद्वारे अलीकडेच 1.25 लाख युवक-युवतींनी अर्ज सादर केले असून त्यापैकी 41 हजार मतदार 1 एप्रिल 2023 पासून मतदान करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत.

राज्यात एकूण 58,282 मतदान केंद्रे

राज्यात प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 883 मतदार या प्रमाणे एकूण 58,282 मतदान केंद्रे स्थापन केली जातील. शहरी भागात 24,063 आणि ग्रामीण भागात 34,219 मतदान केंद्रे असतील. विशेष करून महिलांसाठी 1320 महिला मतदान केंद्रे, 224 दिव्यांग मतदार केंद्रे आणि 240 आदर्श मतदार केंद्रे स्थापन करण्यात येतील. तसेच 1200 मतदान केंद्रे संवेदनशील केंद्रे असणार आहेत. राज्यातील 50 टक्के मतदान केंद्रे वेबकास्टिंग सुविधांनी युक्त असतील, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात विशेष सुविधा उपलब्ध केल्या जातील. घरापासून मतदान केंद्रापर्यंत पिक अॅण्ड ड्रॉप सुविधा केली जाईल. त्याकरिता अॅपवर नोंदणी करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रावर व्हिलचेअर, प्रीयॉरिटी व्होटींग मशीन, दृष्टीहीन मतदारांना ब्रेल बॅलेट पेपरसारख्या अनेक सुविधा उपलब्ध केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं