आज महाराष्ट्रभरात वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आरोग्यदायी आणि दीर्घायुष्याची मागणी करतात. अशातच कोल्हापूरातून एक व्हिडीओ समोर आला आहे.
वटपौर्णिमा करताना वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या दोऱ्याला आग लागल्यामुळे वडाचं झाडा जळत असल्याचं दिसत आहे. कापूर पेटवल्याने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरातील आहे. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत आग विझवली.
अंबाबाई मंदिरात वटपौर्णिमा निमित्त महिलांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान येथे आलेल्या एक महिलेने झाडावर पेटता कापूर टाकला. यामुळे झाडाने पेट घेतला. या घटनेनंतर सर्व महिलांना झाडाजवळून लांब करण्यात आले.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात वटपौर्णिमा निमित्त महिलांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान येथे आलेल्या एक महिलेने झाडावर पेटता कापूर टाकला. यामुळे झाडाने पेट घेतला.#Kolhapur #VatPaurnima #News18Lokmat pic.twitter.com/xC3dwFbVMd
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2023
वडाची पूजा का केली जाते? हिंदू धर्मात देवी-देवतांसोबतच झाडे आणि वनस्पतींची पूजाही महत्त्वाची आहे. शास्त्रामध्ये तुळशी, केळी, पीपळ, आवळा, शमी, वड यासह अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा करण्याचा नियम आहे. ही झाडे आणि झाडे धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र आणि पूजनीय मानली जातात. अशाच प्रकारे वटवृक्ष दीर्घायुषी व विशाल असतो.
त्याची पूजा केल्याने माणसाचे अनेक संकट दूर होतात. अशी धार्मिक मान्यता आहे. वटवृक्षाला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचा खजिना मानले जाते. काही झाडं मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतात. वादाचे झाडदेखील त्यापैकीच एक आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार, वड, कडुनिंब, तुळस ही झाडं आणि रोपं दिवसात २० तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन निर्माण करू शकतात. त्यामुळे या झाडांच्या सान्निध्यात राहिल्यास ऑक्सिजनची कमतरता भासू शकत नाही.