ग्राम विकास अधिकारी साहेब…सांगा या रस्त्यावरून आम्ही कसे वापरावे? साकळी गावातील ग्रामस्थांचा सवाल!

जुने पोस्ट ऑफिस भागातील दोघं धाप्यांची दुरावस्था

नविन धापे बांधण्यात यावे ग्रामस्थांची मागणी

साकळी – येथील जुन्या पोस्ट ऑफिस भागातील गटारीवरील दोन ठिकाणचे धापे पूर्णपणे तुटलेले व खचलेले असून हे धापे या भागातील नागरिकांच्या वापरासाठी अतिशय धोकेदायक व त्रासदायक बनले आहे.या धाप्यावरून वाहनाने वापरणे सोडा तर सोडाच पायी चालणेही कठीण व जिवघेणे बनले आहे.या ठिकाणाहून वापरताना रात्रीच्या वेळी अनेक नागरिक पडतही आहे.या धाप्यावरील वापराचा त्रास पाहता नागरिकांच्या तोंडून संतप्तपणे आपोआप म्हटले जात आहे की,ग्रामविकास अधिकारी साहेब… सांगा या रस्त्यावरून आम्ही कसे वापरावे ? एवढी बिकट अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे.तरी सदर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देऊन या भागातील धापे नव्याने बनवण्यात यावे अशी मागणी या भागातील रहिवासी करीत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,येथील जुने पोस्ट ऑफिस भागातून जाणारा रस्ता हा कुंभारवाडा,हनुमान पेठ या भागातील नागरिकांच्या वापराचा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याने महिला-पुरुष,शालेय विद्यार्थी,अबालवृद्ध तसेच

ग्रामंस्थांची या सर्वांची नेहमी वर्दळ असते.दरम्यानचे या रस्त्यावरील डॉ.मकरंद नेवे यांच्या जवळील गटारीवरील धापा पूर्णपणे खराब झालेला असून हा धापा नागरिकांच्या वापरासाठी अयोग्य,जिवघेणा व डोकेदुखी बनलेला आहे.धाप्यांवर मधोमध खड्डे पडलेले असून या धाप्यांची पूर्णपणे पडझड झालेली आहे.त्याचप्रमाणे याच रस्त्यावरील कुंभार वाड्यालगत लक्ष्मण कुंभार यांच्या घराजवळील गटारीवरील दुसरा एक धापा हा सुद्धा पूर्णपणे खचला आहे व नागरिकांच्या वापरासाठी धोकेदायक बनलेला आहे.या दोघं धाप्यांच्या दुरावस्तीमुळे या भागातील गटारींचे सांडपाणी अडून सदर भागात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या भागातील धाप्यांची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने या ठिकाणची पाहणी करावी व नागरिकांच्या अडचणी समजून घ्यावी तसेच या भागातील दोघं

धाप्यांचे लवकरात- लवकर नव्याने बांधकाम करण्यात यावे मागणी ग्रामस्थ करीत आहे.याबाबतचे लेखी निवेदन सदर भागातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला देणार आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला