हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111 वी जयंती आणि कृषी विद्यापीठ नामांतराचा 11वर्धापन दिन बंजारा ,भटके विमुक्त,ओबीसी आणि बहुजन समाज बांधवांनी उत्साहाने साजरा करावा अशी आवाहन गोर केसूला ग्रुपचे अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केला आहे.

या संदर्भात वासुदेव राठोड म्हटले की एका तांड्यात जन्माला आलेल्या स्व. वसंतराव नाईक साहेबांनी शेती आणि शेतकरी हेच केंद्रबिंदू म्हणून राजकारणाची सुरुवात केली पुसद नगर परिषदेचे नगराध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून राहण्याची संधी त्यांना मिळाली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचे कार्य हे शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढे मोठे काम त्यांनी केले होते. रोजगार हमी योजना सारखी गोरगरिबांच्या मदतीसाठी सर्वात अगोदर योजना राज्यात पहिली राबवली जायकवाडी,कोयना सारखे मोठे प्रकल्प उभे उद्या करून शेतकरी बळीराजाला सुजलाम सुफलाम बनविले.शेती सोबतच औद्योगिक क्षेत्र विकसित करणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव मुख्यमंत्री होऊन गेले. शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडावी त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी म्हणून चार कृषी विद्यापीठाची स्थापना केली. राज्यात 1972 साली भीषण दुष्काळ पडला असताना लोकांना जीवनदान दिले. नाईक साहेबांनी सामाजिक,शैक्षणिक, क्षेत्रात वंचित लोकांनी प्रगती करावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले. माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा मरणोतर सन्मान व्हावा या साठी परभणी कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात यावे या साठी नामांतर चळवळ उभी केली आणि पंधरा वर्षे लढा दिल्यानंतर 1 जुलै 2013 ला नामांतर करण्यात आले. याकरिता राज्यातील तमाम बंजारा,भटके, दिनदलित ,ओबीसी बहुजन समाज बांधवांनी 1 जुलै रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांची जयंती आणि नामांतराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा अशी आव्हान वासुदेव राठोड यांनी केला आहे.

ताजा खबरें