उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा; म्हणाले, 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री कितीचा असेल?

मुंबई – : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरी देखील काही पावटे, आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे, या पावट्यांना कुठे मोड फुटले आहेत, माहित नाही.अहो, आता तर यांची इथपर्यंत मजल गेली की, हिंदुह्रदयसम्राटांचा मी पुत्र आणि तेलंगणाच्या भाषणामध्ये ते मला नकली संतान म्हणाले. मोदीजी, मी तुम्हाला माझं जन्मदाखला तुमच्याकडे मागितला नाही, तेवढी तुमची लायकीही नाही. तुम्ही कुणी ब्रम्ह्रदेवाचा अवतारही नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींसह शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.

माझे कवच तुम्ही काढू शकत नाही 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज तुम्ही माझं सगळं चोरलंत ना? चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. त्यांना प्रश्न पडलाय, संपूर्ण देशाची फौज मोदींकडे आहे, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना ते घाबरतात, कारण, शिवसेनाप्रमुखांचे व तुमच्या रुपाने माझ्या भोवती जे कवच आहे. ते मोदी तुम्ही काय, तुमच्या कित्येक पिढ्या, मी राजकारणाचं बोलतोय वैयक्तिक नाही, कारण राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

मशाल कशी पेटली बघा…! 

पुढे बोलताना म्हणाले की, 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिलंय पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केलं आहे.

कांदा उत्पादकांना अडवले 

उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकात प्रज्वल रेवण्णा बलात्कार करणारा माणूस आहे. महिलांवर अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस आहे. मोदी सांगतात या रेवण्णाला मत म्हणजे मोदीला मत. हा माझ्या शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले यापुढे दक्षता घेऊ. म्हणजे तुम्हाला सुद्धा समजलंय की, ज्या डोक्यावर तुम्ही जिरेटोप घातला. ते डोक त्या लायकीचे नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, असं सांगणारे शिवाजी महाराज कुठे आणि नाशिकमध्ये येऊन कांदा उत्पादकांना अडकून ठेवणारे नतद्रष्ट सरकार कोठे? असे सवालही उद्धव ठाकरेंनी केले.

आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलं

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज कांदा उत्पादक शेतकरी इथे आले आहेत. मी पोलिसांना विचारतो यांना का अडवलं नाही? हे कसे आले माझ्या सभेत? कारण ही माझी माणसं आहेत. मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील सांगतोय. मी माझी लढाई नाही तर तुमची लढाई लढतोय. तुमच्या भरोशावर मी हुकूमशाहच्या समोर उभारलो आहे. मी त्यांना आव्हान देतोय. आज तुम्हाला मुंबईत रस्त्यावर आणलेलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला आम्ही गुडगे टेकायला लावणार आहोत. आम्ही महाराजांची शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान आणि आपल्याकडेचे गद्दार सोबत घ्यावे लागले. 70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल. ही सगळी नकली संतानं. कारण मोदीजी तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाहीत, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.