जामनेर बोदवड रस्त्यावर भीषण अपघातात तीन जण ठार

जामनेर – येथील जामनेर बोदवड रस्त्यावरील मल दाभाडी फाट्याजवळ विचित्र अपघात होऊन या अपघातात वाडे किल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये वाडीकिल्ला (ता. जामनेर) येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (४२, रा. मालदाभाडी, ता. जामनेर), सुनील शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा समावेश आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सुनील भोई व दत्तू माळी हे दोघेजण बोदवड येथून जामनेरकडे दुचाकीने येत असताना त्याच वेळी वाडी किल्ला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी हे त्यांच्या दुचाकीने वाडी किल्ला येथून माल दाभाडी कडे येत होते. यात दोघा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कारणे दोन्ही दुचाकींना धडक दिल्याने यात तिघांचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातात सुनील भोई, दत्तू माळी व ईश्वर पारधी या तिघांचा जागीच मृत्यू झाला .तर कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या त्यांना बोदवड येथे उपचारासाठी नेण्यात आले.