ज्यांना पुरावा हवा, त्यांनी दरबारात या; बागेश्वर बाबांचं मुंबईत विरोधकांना आव्हान

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत.

यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस, मनसेसह अनेकांनी विरोध दर्शवला होता. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना एक आव्हानही देण्यात आलं होतं. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुंबईच्या नजीक असलेल्या मीरारोड परिसरात त्यांचा दरबार भरवण्यात आला आहे. दरम्यान, आपल्याला कोणालाही पुरावा देण्याची गरज नाही, ज्यांना पुरावा हवाय त्यांनी दरबारात या असं आव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय.

“कोणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये. परंतु आपल्याला कोणालाही पुरावे देण्याची गरज नाही. ज्यांना आपल्यापासून समस्या आहे, त्यांनी येऊन पुरावा घ्यावा. ज्यांना गरज आहे, त्यांनी यावं आम्ही मलम लावू, पॅरासिटॅमॉलची गोळी देऊ,” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. “त्यांनी पहिले माझ्या भक्तांचा सामना करावा. संपूर्ण भारत आमचा आहे. आम्ही लोकांना शिक्षित करून सनातनशी जोडूनच राहू. भारतातील मंत्र आणि भारतातील ऋषि मुनींमध्ये किती ताकद आहे, हे आम्ही त्यांना सांगू,” असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या दरबारात जय सितारामसह छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या.

“जर आपला कोणी विरोध करत असेल, तर तुम्ही मन दुखावून घेऊ नका. प्रभू श्रीराम होते तर रावणाच्या कुटुंबातील लोकही होते. आपण महाराष्ट्रात येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले गेले. परंतु आता आपण पुन्हा मुंबईत येऊ आणि जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत येत राहू,” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. “ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांचेही धन्यवाद. जर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबवू इच्छित आहात, तर एक आठवडा नक्की देऊ, परंतु धर्माला विरोध करणाऱ्याची सुट्टी करून. भारत हिंदू राष्ट्र नक्कीच बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांनी समोर यावं

आपल्याला विरोध करणाऱ्यांनी येऊन अर्ज करावा. आपण प्रत्येक गोष्टी सांगू. ज्याला आपल्यात ढोंगीपणा दिसतो त्यानं आपल्यासमोर यावं. ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल. आपण स्वत:साठी बोलत नसून येणाऱ्या पिढीसाठी बोलत आहेत. जेणेकरून कोणीही मंदिरावर दगडफेकही करू शकणार नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. दरम्यान, यावेळी ठाण्यात बागेश्वर धाम मंदिर उभारलं जाणार असल्याचं ते म्हणाले.

 

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील