चोपडा – लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषदेच्या अधिवेशन प्रसंगी जनतेच्या न्याय व हक्कांपेक्षा वैयक्तिक राजकीय कुरघोडीच्या विषयांवरच जास्त वेळ खर्च होत असतो. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधारी व विरोधकांत कलगीतुरा सुरू असतो. ह्या सर्व सभांमध्ये अनाठायी वेळ व पैसा खर्च होत असतो. भारतीयांच्या वेगवेगळ्या करांतून संसदेचा खर्च भागविण्यात येतो. संसदेतील ज्या लोकप्रतिनिधींमुळे वेळ वाया जातो.अशा उत्तरदायींकडून दंड वसूल करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी परखड प्रतिक्रिया चोपडा तालुका कोळी समाजाचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या पाच वर्षात राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया गेला असून जनतेची कामे अजूनही अपूर्णच आहेत. राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.
त्यांचे राज्यसभेच्या सभापतिपदाचे चौदावे व शेवटचे सत्र अधिवेशन असून येत्या पाच वर्षांमध्ये १३ सत्रातील नियोजित २४८ दिवसांपैकी केवळ १४१ दिवस कामकाज झाले आहे. म्हणजे ५७ टक्के वेळ वाया गेला आहे,याबाबतची खंतही श्री.नायडु यांना आहे.संसदेतील काहि सदस्यांकडुन गदारोळ होऊन त्यांचे निलंबन अटळ असते.यावेळी राजकिय दबावापोटी काही काळ व वेळ कामकाज तहकुब करण्यात येते.यामुळे सर्वसामान्यांच्या विकासाएैवजी विरोधाचेच राजकारण करण्यात येते.हि परिस्थिती पालट झाली पाहिजे,अन्यथा यापुढेही असेच सुरू राहिले तर भारतीयांनी आपापल्या लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे, असेही आवाहन गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.
खा.अधीर रंजन चौधरी यांच्या वक्त्व्याचा निषेध
भारताच्या नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मुर्मू यांचेबद्दल संसदेचे सदस्य खा.अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती एैवजी राष्ट्रपत्नी असे असैवंधानिक वक्तव्य करून त्या पदाचा,राष्ट्राचा,व्यक्तिचा व जमातीचा अपमान केला आहे.त्यांचा आम्ही आदिवासींतर्फे जाहिर निषेध करित आहोत..