अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

जळगाव – माणूस आज किती विकृत बुध्दीचा झाला हे जळगाव जामोद तालुक्यातील घटनेवरून पुन्हा अधोरेखीत झाले आहे. आपल्या चारचाकी वाहनाने झालेल्या अपघातात गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी नेतो असे सांगून आरोपीने चक्क जंगलातील दरीत टाकून दिले व उपचार न मिळाल्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. यासंदर्भात सविस्तर असे की, जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील आदिवासी युवक मन्साराम छत्तरसिंग वासकले (२२) हा लग्न समारंभाकरिता (ता.३०) भिंगारा येथे गेला होता.

लग्न समारंभ संपन्न झाल्यानंतर तो दुचाकी क्रमांक एमएच २८ एच ९१८९ ने संध्याकाळी आपल्या गावाकडे परत येत असताना निमखेडी ते सुनगाव रस्त्यावर गोराडा धरणा जवळ मालवाहू पिक-अप क्रमांक एमएच २७ बीएक्स ५३८२ च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन त्याच्या दुचाकीस धडक दिली.

या अपघातात मन्साराम वासकले हा गंभीर जखमी झाला. दरम्यान घटनास्थळावर लोकांसमक्ष जखमी मन्साराम यास उपचाराकरीता दवाखान्यात घेवुन जातो असे सांगून लोकांच्या मदतीने आरोपी मालवाहू चालकाने स्वताच्या वाहनामध्ये जखमी व्यक्तीस बसवून घेवून गेला.

परंतु जखमीस उपचाराकरीता दवाखाण्यात घेवून न जाता आरोपीने बऱ्हाणपूर रोडवरील शांतीलाल सस्ता यांचे शेतालगत असलेल्या जंगलात जखमी मन्साराम वासकले यास गाडीतून ढकलून दिल्याचे अमानवीय कृत्य केले.

उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होवू शकतो याची जाणीव असताना आरोपी मालवाहु चालकाने जंगलातील निर्मनुष्य स्थळी त्याला टाकून देवून पोबारा केला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून मन्साराम वासकले हा तेथेच पडून होता.

उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान (ता.२) सकाळी बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून पोस्ट मॉटम करीता मृतदेह ग्रामीण रूग्णालय जळगाव जामोद येथे पाठवला.

दरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा काही नागरिकांची याचे आपले मोबाईलमध्ये चित्रण केले होते. तर घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर सुध्दा व्हायरल झाला होता. त्यामुळे मालवाहू वाहन क्रमांकाच्या आधारे तपास करत ठाणेदार आनंद महाजन यांनी आपले तपासचक्र गतिमान करून एका तासाच्या आत मालवाहू पिक-अप क्रमांक एमएच २७ बीएक्स ५३८२ चा चालक आरोपी योगेश सोपान महाजन वय ४० वर्ष, रा.बोरसर ता.जि.बऱ्हाणपूर यास अटक केली असून त्याच्याविरूध्द कलम ३०४, २०१ भादवी सह कलम १३४/१८६ मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपीस कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.

जळगाव जामोद वरून मध्य प्रदेशात जाण्यासाठी सातपुडा पर्वतातून एक जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अनेकदा भीषण अपघात होत आहेत. याकडे महाराष्ट्र व मध्यप्रदेश पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

तसेच जळगाव जामोद कडून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या सातपुडा पर्वतातील रस्त्यावर एक वनविभागाची चौकी असून सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस, अन्न व औषध प्रशासन तसेच महसूल विभागाचे कर्मचारी दिवसरात पहारा देतात.

या ठिकाणी दोन्ही कडून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी होते. परंतु असे असले तरीही या जखमी युवकाला ज्या पिकप वाहनातून नेण्यात आले त्या वाहनाची नोंद या चौकीतील पोलिसांच्या रजिस्टरमध्ये नाही.

ही एक गंभीर बाब असून येथे तैनात अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या गोराळा धरण परिसरात झालेल्या अपघातातील गुन्ह्यामध्ये या चेक पोस्टवरील कर्मचारी सुद्धा तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी मृतक इस्माच्या नातेवाईकांनी केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील