चोपडा(प्रतिनिधी) तापी नदीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहिला पाहिजे यासाठी हतनुर धरणातून दरवर्षी जानेवारी मार्च व मे महिन्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांचा मागील वर्षापासून पाठपुरावा सुरू होता.याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी यांचेसह संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलेले आहे. त्यानुसार ह्यावर्षी तापी नदीत पाण्याचे आवर्तन सोडल्याने जुन्या व कोरड्या विहिरी तसेच नवीन कूपनलिकांची पाण्याची पातळी वाढली आहे.यामुळे तापी नदी काठच्या ग्रामस्थं व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नदीतील कच्चा रस्ता वाहून जाण्याची शक्यता..
खेडीभोकरी ते भोकर दरम्यान तापी नदीवर दरवर्षी एक जानेवारीपासून हंगामी लाकडी पूल सुरू करण्यात येतो.परंतु यावर्षी हा पूल बनवण्यात आला नव्हता त्यासाठीही आम्ही पाठपुरावा केला असता संबंधित विभागाने नदीत सिमेंटपाईप माती रेती टाकून कच्चा रस्ता तयार केला आहे.आता नदीला पाणी आल्याने हा रस्ता वाहून जाण्याची शक्यता असून वाहतूक बंद होऊ शकते.म्हणून नवीन पूल तयार होईपर्यंत दरवर्षी येथे हंगामी लाकडी पूल बनवण्यात यावा..
जगन्नाथ बाविस्कर माजी संचालक..मार्केट कमिटी चोपडा.