शिवशंभू संघटना युवती जिल्हाध्यक्ष पदी दहिगाव च्या युवती ची निवड”

दिपक नेवे

यावल -दहिगांव ता यावल येथील युवती कुमारी कविता ज्ञानेश्वर पाटील गेल्या एक ते दीड वर्षांपासून शिवशंभू संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतांना दिसून येत आहे,वृक्षरोपन,भव्य रक्तदान शिबिर,आदिवासी महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान,सैनिकांच्या कुटूंबिचा सत्कार,विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे याप्रकारचे अनेक कार्य गेल्या एक वर्षापासून केल्यामुळे त्याच्या कार्याची दखल घेत कु.ज्योतीताई पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांनी पत्राद्वारे त्याची जळगांव जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे कळवले,तेव्हा या निवडीने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे,यानिवडी नंतर कविता पाटील हिचे म्हणणे आहे की गोरगरिबांच्या अडचणी, महिला अडीअडचणी न्याय हक्कासाठी तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तप्तर असेल असे त्यांनी म्हटले आहे…

jalgaonsandesh

jalgaonsandesh