पैशांच्या व्याजासाठी शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग, गुन्हा दाखल

जळगाव – दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. चिमुकल्या मुलींसह अबाल वृद्धा देखील असुरक्षित आहेत. त्यातच जळगावमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पैशांवरील व्याज न दिल्याने सिंधी कॉलनी परिसरातील शाळेत १५ वर्षीय मुलीस बळजबरी नेत विनयभंग करून धमकावण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन महिलासंह त्यांच्या पतींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडितेला धमकावणारा शिक्षक असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजूच्या व्यवसायासाठी पीडितेच्या आईवडिलांनी सुवर्णा रामकृष्ण पाटील (रा. संत मीराबाईनगर) व वंदना अजय पाटील (रा. खोटेनगर) यांच्याकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. त्यापोटी चार कोरे चेक दोघांना दिले होते. पीडितेच्या आईने घेतलेल्या दोन लाखांऐवजी तब्बल सहा लाख रुपये व्याज म्हणून दोघी महिलांना परत केले आहे. तरीही १ लाख ४० हजारांची बाकी असल्याने संबंधितांकडून पैशांचा तगादा सुरू होता.

संशयितांनी मुलीला १२ जूनला बळजबरी दुचाकीवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या आईने फोनवरून विनवण्या केल्यावर दोघी बहिणींना सोडून देण्यात आले. पीडिता शिक्षण घेत असलेल्या शाळेत संशयित सुवर्णा पाटील यांचे मेहुणे अजय शांताराम पाटील शिक्षक आहेत. १८ जूनला या शिक्षकाने पीडितेला पैशांसाठी धमकावले व विनयभंग केला. घडला प्रकार कुणाला सांगितला, तर दोघी बहिणींना मारून टाकू, असे धमकावल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले आहे.

मदतीनंतर तक्रार

दरम्यान पीडित कुटुंबाने भितीमुळे कुठेच तक्रार न केल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. अखेर मेहरुण परिसरातील काही सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांना घडलेला प्रकार सांगितला.

अखेर गुन्हा दाखल

या प्रकरणी सुवर्णा पाटील, रामकृष्ण देवराम पाटील (रा. संत मीराबाईनगर) शिक्षक अजय पाटील, वंदना शांताराम पाटील (श्रद्धा कॉलनी, दत्तमंदिराजवळ) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले तपास करीत आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला