साकळीसह परिसराला पुन्हा वादळाचा तडाखा उरलेल्या केळी भुईसपाट मान्सुन पावसाची हजेरी

 

साकळी – आज दुपारच्या दरम्यान साकळी गावासह परिसराला जोरदार वादळाचा पुन्हा तडाखा बसला यात साकळीत काही ठिकाणी विजेच्या तारांवर झाडं पडली आहे तर बऱ्याच ठिकाणी गुरांच्या गोठ्यावरील तसेच राहत्या घरांवरील पत्रे उडाली.या वादळाच्या तडाख्याने मुख्य वाहतूकी रस्त्यांवर मोठी झाडे उन्मळून पडलेली आहे.सुदैवाने कोठेही जीवित हानी झालेली नसल्याचे समजते.वादळा दरम्यान साकळीत मान्सूनच्या सरीही कोसळल्या. जोरदार हवा सुटायला लागली व निसर्गाने आपले रूप अचानकपणे पालटले रौद्र रुप धारण केले. व जोरदार हवेचे भयावह वादळात रूपांतर झाले.जोरदार वादळामुळे धुळीचे लोट उडत होते.व जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळी वारा सुरू होता.गेल्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेच दि.४ रोजी वादळ झाले या वादळात परिसरातील शेतांमधील केळी बागांचे खूप मोठे नुकसान झाले होते.तर तीन दिवसापूर्वीच्या वादळात शेतातील जी केळीची झाडे वाचली होती ती आजच्या वादळात पूर्णपणे जमीनदोस्त झालेली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून ते शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आजच्या वादळात गावातील अनेकांची घरावरची व इतरत्र ठिकाणावरची पत्रे उडाली यात भवानीदेवी मंदिर परिसरातील कै.मंगल सोनार यांच्या मालकीच्या ढोरांच्या गोठ्यावरील संपूर्ण पत्रे उडाली तर कुरेशी वाड्यालगत कय्युम शहा बाबा यांच्या घराजवळील झाडाची भली मोठी फांदी तुटून विजेच्या तारांवर अडकली.जर ही फांदी विजेच्या तारां ऐवजी जमिनीवर खाली पडली असती तर दोन ते तीन घरांची मोठी हानी झाली असती. असे येथील रहिवाशांनी सांगितले.वादळानंतर काही वेळ जोरदार पावसाच्या सरीही कोसळल्या व मान्सूनने हजेरी लावली.पावसाचा शिडकावा झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.वादळा दरम्यान विज गेलेली होती तर विजेचा अधून-मधून लपंडाव सुरू होता. वादळामुळे परिसरातील शेतकरी वर्ग चांगलाच धास्तावलेला आहे

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला