सांड माजावर आला .

गावात एक बैल असे.सार्वजनिक बैल.ग्रामपंचायतचा बैल.ज्याला सांड म्हणत.तो कोणत्याही शेतात शिरून धुमाकूळ घालत असे.त्याला शिक्षा नाही.कोंडवाडा नाही.तो कोणत्याही गाईला आणि बाईला धडक दिली तर वाईट मानत नाहीत.कारण तो सर्वानुमते, सर्वमान्य, सन्मानित केला होता.हे स्थान ,हा मान,ही शान आता जळगावच्या नगरसेवकांनी मिळवली आहे.

आम्ही आमच्या कॉलनीत,वार्डात,प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरपालिकेत प्रतिनिधी निवडून देतो.अपेक्षा असते याने सरकार दरबारी जाऊन निधी आणावा आणि काम करावे.पण जितकी अपेक्षा ठेवतो तितकी गुणवत्ता तपासून पहात नाही.जो दारू, सट्टा चा धंदा आणि रेती ,राशन ची चोरी करतो ,जो गणपती, नवरात्री, शिवजयंती ला देणगी देतो त्याला आम्ही नागरिक भला माणूस समजतो.आणि हजार पाचशे दिले कि मतदान करतो.येथेच आमची चूक होते.तिच चूक आम्ही दर पांच वर्षांनी रिपीट करतो.त्यामुळे त्या माणसाला गैरसमज होतो कि,या वीस पंचवीस हजार लोकांमधे मीच सुपरमॅन आहे.जसा शे दोनशे बैलांमधे मीच सांड आहे.अशा बैलाला सांड चा सन्मान आम्हीच देतो.

जळगाव शहरात असे अनेक बैलांना आम्ही नागरिकांनी सांड बनवले आहे.त्यांना लुट करण्याची छुट दिली आहे.तो कोणत्याही रेती माती डांबर सिमेंट चे कमीशन खाऊ लागला आहे.नाही तर वाट्टेल तेथे शिंग मारू लागला आहे.त्याने अनेक नागरिकांना जखमी केले.पळवले.धाकवले.

जळगाव नगरपालिकेत असे अनेक सांड आम्ही आमच्या सहमतीने पाठवले आहेत.एकाने तर माईक घेऊन महापौराला मारला.दुसरा तर सरळ व्यासपिठावर जाऊन चढला.तिसरा तर कॉलर पकडून गुद्दा मारू लागला.चौथा तर सरळ मक्तेदाराला धमकी देऊ लागला.पांचवा तर दारू ढोसलून माय बहिण एक करू लागला.सहावा तर ओपन स्पेश बळकावून बसला.काल परवाच एका सांडने तर चक्क एका मक्तेदाराला भांड भांड करुन इज्जतीचा फालुदा केला.आता या सांडांची बायका पोरांना,माणसांना भीती वाटू लागली आहे.आम्हीच सोडलेला, आम्हीच वाढवलेला,आम्हीच पोसलेला सांड आता आमचीच खाण खोदू लागला आहे.तर आता याचे ” सांड ” पद बरखास्त करण्याची वेळ आलेली आहे.रेती माती दारू राशन कमीशन चा खुराक बंद करण्याची वेळ आलेली आहे.

एकाच बैलाला पुन्हा पुन्हा सांड पदावर निवडून दिल्याचा हा दुष्परिणाम आहे.आता गावातील नागरिक या सांड पासून त्रस्त झालेला आहे.आमचे गांव, गावातील माणसे ,बायको,पोरं वाचवायची असतील तर हा सांड बदलणे आवश्यक झाले आहे.आता आमचा सांड माजावर आला आहे.

शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला