महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

मुंबई – 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे.

हेच औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयुष्यात पहिलं रिल केलं आहे. यामाध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला विशेष आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांचं हे रिल सोशल मीडियावर हे रिल तुफान व्हायरल होत आहे.

राज ठाकरे यांनी रिल स्टार अथर्व सुदामेसोबत महाराष्ट्र दिनानिमित्त खास व्हिडीओ बनवला आहे. या रिलमधून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाचं महत्व सांगितलं आणि मराठी भाषा संवर्धनाविषयी भाष्य केलं. रिलमध्ये सुरुवातीला अथर्व सुदामे भाषणाची तयारी करताना दिसून येत आहे. यात राज ठाकरे यांची एन्ट्री होते आणि दोघांमध्ये महाराष्ट्र आणि मराठी भाषा यावर संवाद होते. रीलमध्ये अथर्व म्हणतो आहे, ‘1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. निर्मिती झाली, ती सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची.. ज्ञानोबा, तुकाराम, छत्रपती यांनी खरंतर महाराष्ट्र घडवला’.

राज ठाकरे यांची व्हिडीओमध्ये एन्ट्री होते आणि ते अथर्वला विचारतात, ‘काय अथर्व कधी आलास, काय चाललंय?’. त्यावर अथर्व उत्तर देतो, ‘1 मे निमित्त जरा छोटंस भाषण आहे. ते जरा पाठ करण्याचा प्रयत्न करतोय’. यावर राज ठाकरे म्हणतात, ‘भाषण पाठ करतोय..बघू… संयुक्त महाराष्ट्र, टिळक, शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर, पु.ल.देशपांडे, मंगेशकर, बाळासाहेब, तेंडुलकर व्हा छान उल्लेख आहेत. इतिहास, संस्कृती याबद्दल उत्तम लिहिलं आहेस’, असं म्हणत त्याचं कौतुक करतात. यावर अथर्व त्यांना ‘साहेब यात काही बदल” असं विचारतो.

https://www.instagram.com/reel/C6YrSprItr3/?igsh=eHBxYXVydWJ0Y2l6

राज ठाकरे म्हणतात, ‘बदल काही नाही.. उत्तम आहे हे…परंतु आपण आज काय करतोय ना ते देखील सांगणं गरजेचं आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कतृत्व गाजवलं, महाराष्ट्र मोठा केला. आज आपण असं काय करणार आहोत, ज्यामुळे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल. मला असं वाटतं त्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे. समोरचा पटकन हिंदीत बोलल्यावर आपण गरंगळत जाऊन हिंदी बोलतो. त्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही’.

यावर अथर्व म्हणतो, ‘खरं आहे साहेब… ससा तो ससा की कापूस जसा हे शिकलं पाहिजे. बहात्तर आणि अठेचाळीस म्हणता आणि वापरता आलं पाहिजे. कारण आपण येत नाही म्हणून वापरत नाही. वापरत नाही तर गरज नाही असं वाटतं’. यावर राज ठाकरे म्हणतात, ‘हा अभिमान आणि स्वाभिमान टिकवणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला छोटासा खारीचा वाटा देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तु जे चांगलं काम करतो आहेस. चांगले करतो आहेस. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत’. राज ठाकरेंनी अथर्वला शुभेच्छा दिल्यानंतर बॅकग्राऊंडला ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं वाजतं. सध्या हे रिल चांगलचं चर्चेत आलं आहे

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं