अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या जन आक्रोश मोर्चा तर्फे जाहीर मागणी

जळगाव – नांदेड़ जिल्ह्यातील बोडार येथील अक्षय भालेराव या तरुणाने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून गावातील काही गुंड लोकांनी त्याची हत्या केली, या घटनेच्या विरोधात जळगाव येथील अनुसूचित जाति, जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिति तर्फे दिनांक २३ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

या समिती तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.

१) अक्षय भालेराव याची हत्या करणाऱ्यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी .

२) अक्षय भालेरावच्या हत्येची एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी.

३) अक्षय भालेरावच्या कुटुंबातिल सदस्यास शासकीय नौकरी देण्यात यावी.

४) अक्षय भालेरावच्या कुटुंबास ५० लाखाची मदत देण्यात यावी.

५) एट्रोसिटी कायद्याची कड़क अंमलबजावनी करण्यात यावी.

६) महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.

सदर मोर्चा रेलवे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून नेहरू चौक, चित्रा चौक, शिवाजी महाराज यांचा पुतळा, बस स्टैंड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यर्पण करण्यात आले. त्या नंतर मोर्च्याचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतात व महाराष्ट्रात दलित, आदिवासी, अल्पसंख्यक समाजावर मोठ्यप्रमानात अन्याय, अत्याचार होत आहेत.

प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी अत्यंत सविस्तर मांडणी करुण देशात जातीय , धार्मिक दहशत निर्माण करुण जनजीवन बरबाद केले जात असून सरकार संविधान विरोधी वागत आहे. कोणी काय खावे, कसे कपडे परिधान करावे या वरुन सुद्धा दंगली घडविल्या जातात प्रसंगी लोकांचा जीव घेतला जातो. सरकार या बाबत कठोर निर्णय न घेता गुन्हेगार लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. यामुळेच भारतात लोकशाही नाममात्र राहिली आहे आणि यातूनच अक्षय भालेराव सारख्या युवकाची हत्या घडून येते असे जयसिंग वाघ यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी करीम सालार, फारुख शेख, जगन सोनवणे, राजू सूर्यवंशी यांचीही भाषणे झाली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे संयोजक मुकुंद सपकाळे, जगन सोनवणे, राजू सूर्यवंशी, सुमित्र अहिरे यांनी भाषणे केली. सर्वांनी सरकारवर कड़क टिका करुण अक्षय भालेराव ची हत्या करणाऱ्यांना फाशी ची शिक्षा देण्याची व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली. मोर्च्यात सतीश गायकवाड़, सुरेश सोनवणे, धुडकु सपकाळे, दिलीप सपकाळे, मिलिंद सोनवणे, राजू मोरे, प्रतिभा शिरसाठ, शारदा इंगळे, लता बाविस्कर, राजू सवरने, चेतन नंनवरे तसेच शेकडो कार्यकर्ते हजर होते.

ताजा खबरें