लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार ! प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा

मुंबई – : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा, प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरच लढणारा आहे का, असा सवालही आंबेडकरांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका, असेही ते म्हणाले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार हा खरंच लढणारा आहे का? एकनाथ शिंदे सोबत समझोता करून झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका. चर्चा चालू झाली आहे असा खळबळ जनक आरोप आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवीचे राजकारण सुरू आहे असे आंबेडकर पुढे म्हणाले. कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर उल्हासनगर मध्ये आले होतेे.

शिर्डीमध्ये लोखंडे, वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीतील लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे. लोखंडे म्हणतात वाकचौरे खुडुक कोंबडी, तर वाकचौरे म्हणतात मी अंडे देणारी कोंबडी मात्र वंचितच्या रूपवतेंनी कोंबडी असो की अंडे ते आम्ही प्रेशर कुकरमध्येच शिजवणार असे म्हणत विरोधकांना आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला.

उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल 

देशातल्या जनतेने आता ठरवले की दिल्लीतले इंजिन बदलायचे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. तसेच नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना बेअकली म्हणत ठाकरेंनी टोलाही लगावला. शिवसना ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कामडींसाठी उद्धव ठाकरेंनी वसईत सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.