चोपडा प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर
चोपडा – तालुक्यात दरवर्षी मान्सूनपूर्व व तद्नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकांचे खुपच मोठे नुकसान होत असते.तेथील पिक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्र.१८००४१९५००४ वर संपर्क करून pikvima @ aicofindia.com याठिकाणी ‘ई मेल’ करावा.यासाठी ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’ डाऊनलोड करून त्याद्वारे अर्ज करावा.ज्यांचे अर्ज ऑनलाइन होत नसतील त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) चे कार्यालय,दुकान क्र.८,आनंद कॉम्प्लेक्स्, मल्हार मोटर्स जवळ,शिवकॉलनी स्टॉप, जळगाव येथे तक्रार अर्ज सादर करावा,अशी सुचक माहिती गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पिक नुकसान नोंदणीसाठीचा कार्यकाळ फक्त ७२ तासांचाच आहे.तो १२० तासांचा (कमीतकमी ५ दिवस) करावा.कारण ज्या परिसरात केळी पिकांचे नुकसान होते,तेथील नुकसानग्रस्तं शेतकरी मरणासन्न अवस्थेत असतो.घर परिवारातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जसे दुःख होते,तसेच शेत शिवारातील पिकांचे नुकसान झाले की,दुःख अनावर होते.अशा वेळेस विमा कंपन्या सांगतात की, ७२ तासांच्या आत नोंदणी केली पाहिजे.काही शेतकरी अशिक्षित तर काहींजवळ अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ते ऑनलाईन नोंदणी करु शकत नाहीत.ऑफलाईनची माहिती नसते.अशातच ७२ तासांचा अवधी निघून जातो.त्यांची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी न झाल्यामुळे पिक विम्याची नुकसान भरपाई मिळतच नाही.म्हणुनच हा अवधी ७२ तासांएैवजी १२० तासांचा करावा,अशीही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.