जळगाव – भारतात संविधान विरोधी शक्ति अधिक सक्रिय असून’ आपल्या देशाचा राज्यकारभार मनुस्मृति ने चालतो का संविधानाने?’ या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात केस ही चालू आहे तेंव्हा सर्व संविधानप्रेमी जनतेने संविधान गौरवार्थ अधिक संघटित व सक्रिय व्हावे असे आवाहन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. दिनांक २६ नोव्हेम्बर रोजी संविधान गौरव समिति जळगाव तर्फे आयोजित संविधान गौरव रैली निमित्त तांबापूरा येथील बौद्ध वस्तित प्रचार सभेत वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की जळगाव शहरात संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. विविध सामाजिक, राजकीय संघटना त्यात सहभागी होत आहेत यात आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. अध्यक्षस्थानी जनक्रांति मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते त्यांनी आपल्या भाषणात संविधानात असलेल्या विविध तरतूदी ज्या मुळे इथल्या सर्व शोषित, अल्पसंख्यांक, स्त्री पुरूष व सर्वच जनतेला न्याय मिळत आहे व तो कसा सुरक्षित आहे याची माहिती दिली. प्रास्ताविक भारत सोनवणे, स्वागत सोमा ससाने, आभार बुद्धपाल सपकाळे यांनी केले. सभेस समाधान सोनवणे , पंकज सोनवणे, रवि सोया, राजू सोया, प्रकाश वाघ, सूर्यभान वाघ, प्रवीण वाघ, संदीप वारुळे मुकेश सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयसिंग वाघ व मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले, शेवटी संविधान गौरवार्थ विविध घोषणा देण्यात आल्या. सभेस लोक मोठ्या संख्येने हजर होते.