पंकजा मुंडे अडचणीत? ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीरंगात आली असतानाच भाजप नेत्या आणि बीडच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे आणि रविकांत राठोड यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. रविकांत राठोड हे बंजारा समाजाचे नेते असून त्यांनी ऐनवेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. रविकांत राठोड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, राठोड यांनी पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून निवडणुकीतून माघार घेतल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पंकजा मुंडे आणि रविंकात राठोड यांच्यात झालेल्या त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यात पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून राठोड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतकंच नाही तर बंजारा समाजाची मते ही मलाच मिळणार आहेत. मात्र, त्यातली पाच-दहा हजार मते घेऊन फार काही होणार नाही, असे पंकजा मुंडे या रविकांत राठोड यांना सांगत आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर रविकांत राठोड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता उभय नेत्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे आणि रविकांत राठोड यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद

बीड जिल्ह्यामध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला असताना निवडणुकीत आपल्याला सहकार्य करावे, असे पंकजा मुंडे या रविकांत राठोड यांना सांगत आहे.

पंकजा मुंडे यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना विनंती केली. तुमची संपूर्ण काळजी घेण्यात येईल, असे देखील आश्वासन दिले. विशेष म्हणजे महामंडळाच्या संदर्भातील तुमच्या त्या कामाला मी सहकार्य करेल, असे सांगून पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना लोकसभा निवडणुकीत आपल्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील