‘त्या’ चार मसाल्यांवरील बंदीनंतर भारताचा मोठा निर्णय, हाँगकाँग, सिंगापूरकडे केली मोठी मागणी!

मुंबई – मसालेनिर्मिती करणाऱ्या भारतातील दोन दिग्गज कंपन्यांच्या एकूण चार मसाल्यांवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये बंदी  घालण्यात आली. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईड  या किटकनाशकाचे प्रमाण अधिक आहे.

या घटकामुळे कर्करोग होण्याचा धोका आहे, असे कारण या देशांनी दिले आहे. दरम्यान या दोन्ही देशांच्या निर्णयाची भारत सरकारने दखल घेतली आहे. भारत सरकारने या दोन्ही देशांना घेतलेल्या निर्णयाबाबत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली, त्या कंपन्यांनाही सविस्तर माहिती विचारली आहे.

भारत सरकारने काय निर्णय घेतला?

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन्ही देशांना बंदी घालण्यात आलेल्या मसाल्यांबाबत एक विस्तृत रिपोर्ट पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्या कंपन्यांनाही आपले सविस्तर मत मांडण्याचा आदेश दिला आहे. याबाबत वाणिज्य मंत्रालयातील एखा अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगने जो निर्णय घेतला आहे, त्याचा विश्लेषणात्मक रिपोर्ट तसेच ज्या निर्यातदारांचे मसाले नाकारण्यात आले, त्यांचीही माहिती मागवण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या दूतावासांना तशी विनंती करण्यात आली आहे. सिंगापूरच्या सेंटर फॉर फूड सेफ्टी आणि खाद्य आणि पर्यावरण स्वच्छता विभागालाही याबाबतचे रिपोर्ट देण्याची विनंती करण्यात आली आहे.

एकूण चार मसाल्यांवर घालण्यात आली बंदी

भारतातील मसाला निर्मिती करणाऱ्या दोन दिग्गज कंपन्यांच्या एकूण चार मसाल्यांच्या विक्रीवर सिंगापूर आणि हाँगकाँगवर बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमध्ये इथिलन ऑक्साईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले होते. बंदी घालण्यात आलेल्या मसाल्यांमध्ये मद्रास करी पावडर, मिश्रित मसाला पावडर, सांबर मसाला तसेच फिश करी मसाला यांचा समावेश आहे.

अभ्यास केल्यानंतरच काय ते समोर येणार

दरम्यान, हाँगकाँग आणि सिंगापूरच्या या निर्णयामुळे भारतात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये ईथिलीन ऑक्साईड यासारखे कर्करोगास कारणीभूत ठरणारे, घटक असू शकतात का? असे विचारले जात आहे. याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे. भारत सरकारने मागवलेल्या विस्तृत रिपोर्टचा अभ्यास केला जाईल. त्यावर संशोधन केले जाईल. त्यानंतरच काय ते समोर येईल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने