यावल येथे मुख्य रस्त्यावर वाहतुकीस मोठा अडथळा अधिकारी,लोकसेवकांचे दुर्लक्ष.

प्रतिनिधी – अमीर पटेल

गटारी अभावी वापराचे घाण पाणी रस्त्यावर …

यावल – येथे यावल भुसावळ रस्त्यावर टी पॉईंट जवळ सम्राट मॉल समोर फ्रुट सेल सोसायटीच्या पत्री कॉम्प्लेक्स मधील वापराचे घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने प्रचंड प्रमाणात वर्दळ,रहदारी असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दिवस रात्र सुरू असलेल्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे, याबाबत यावल सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल नगरपरिषद आंधळ्याची,निष्क्रियतेची भूमिका निभावत असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.

वरील नमूद ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याचे तसेच रस्त्यावर वापराचे घाण पाणी कसे वाहत आहे वाहतुकीस कसा अडथळा निर्माण होत आहे..? याचा प्रत्यक्ष अनुभव यावल तहसीलदार सौ. मोहनमाला माला नाझीकर यांना आज शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या शासकीय वाहनातून आला असेलच..? यावल नगरपरिषद आणि यावल सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी टी पॉईंट पासून भुसावळ कडे पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूने आजूबाजूच्या व्यापारी संकुलनातील व विकसित भागातील वापराचे घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटारीचे बांधकाम केले आहे किंवा नाही आणि वापराचे घाण पाणी वाहून का जात नाही. याबाबत यावल तहसीलदार यांनी यावल नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांना लेखी आदेश वजा पत्रव्यवहार करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत कशी होईल..? रस्त्यावर पडलेले खड्डे बुजण्याबाबत व येणाऱ्या अडचणी बाबत, आणि अपघातात जीवित हानी होऊ नये म्हणून तात्काळ कार्यवाही करून वाहतूक सुरळीत करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

यावल भुसावळ रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे, यावलकडून भुसावळ कडे जाताना उजव्या बाजूने ठेकेदाराने व सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी साईट पट्ट्यांवर मुरूम, खडी टाकून पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बाजूला जे मोठे खड्डे पडले आहेत. ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता शाखा अभियंता ठेकेदारांना यांना दिसून येत नाहीत का.? किंवा ते जाणून बुजून आंधळ्याची भूमिका घेत आहेत का?  याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून याकडे लोकप्रतिनिधी आणि विविध संघटना सुद्धा गप्प असल्याने वाहनधारकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला