तंबाखू-पान मसाल्याच्या जीएसटी रिफंडवर लागू होणार निर्बंध; मोदी सरकारचा मोठा निर्णय!

तंबाखू, पान मसाला आणि मेंथा तेल अशा वस्तूंच्या निर्यातीवरील इंटिग्रेटेड जीएसटी रिफंड रूटवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला होता, ज्याला आता जीएसटी परिषदेने मान्यता दिली आहे.

1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू केला जाईल.

गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेची 50 वी बैठक पार पडली. यामध्ये मंत्र्यांच्या एका गटाने क्षमता-आधारित कर आकारणी आणि विशेष रचना योजनेबाबत काही मागण्या केल्या होत्या. या गटाचे नेतृत्त्व ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी यांनी केले होते.

काय असतील निर्बंध?

पान मसाला-तंबाखू आणि अशा प्रकारच्या उत्पादनांच्या निर्यातीवर एकीकृत जीएसटी रिटर्नची प्रक्रिया यापूर्वी ऑटोमेटेड होती. म्हणजेच, ही प्रक्रिया यापूर्वी आपोआप केली जात होती. मात्र, आता नवीन नियमानुसार, या उत्पादनांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना आपले रिफंडचे दावे मंजूर करून घेण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील टॅक्स अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागणार आहे. या अधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतरच त्यांचे दावे फाईल होतील.

काय होणार फायदा?

या निर्णयामुळे पान मसाला, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवरील कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे. या वस्तूंवर सध्या 28 टक्के आयजीएसटी आणि उपकर लागू होतात. या निर्बंधांमुळे निर्यातदारांच्या रोख प्रवाहात घट होईल, या क्षेत्रातील जागतिक स्पर्धात्मकता कमी होईल आणि निर्यातदारांवर प्रशासकीय दबाव वाढणार आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

सरकारच्या कर महसुलात वाढ

IGST परतावा मर्यादित केल्यामुळे सरकारच्या कर महसुलात तात्पुरती वाढ होऊ शकते. कारण आयटीआर फाईल करण्यासाठीची प्रक्रिया लांबली असल्यामुळे, परताव्याची रक्कम सरकारकडे अधिक काळ राहणार आहे.

तंबाखू निर्यातीवर आळा

या निर्बंधांमुळे कित्येक निर्यातदारांवर रोख प्रवाहाची मर्यादा येईल. यामुळे त्यांच्यातर्फे होणाऱ्या निर्यातीचे प्रमाणही कमी होऊ शकतं. सध्या भारत हा तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा निर्यातदार देश आहे. भारतातातून मध्य-पूर्व आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य उत्पादने पाठवण्यात येतात.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक