रावेरमधील अनेक गावांचा संपर्क तुटला; अजंदेजवळ कार वाहून गेली

रावेर – तालुक्यात सकाळपासून तब्बल पाच तास संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांत पाणी शिरले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान अजंदेजवळ एक वॅगनर कार वाहून गेली. मात्र पती-पत्नी तत्पूर्वीच उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रावेर तालुक्यात बुधवारी (ता. १९) सकाळी दहापासून संततधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी तीनपर्यंत संततधार पाऊस सुरू होता.

दरम्यान, सातपुडा पर्वतातही जोरदार पाऊस झाल्यामुळे गंगापुरी, मात्राण धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. तालुक्यातील सुकी, अभोरा, भोकर, मात्राण यासह नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या नद्यांच्या काठावरील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे.

या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, लुक्यातील सावदा, थोरगव्हाण, रसलपूरसह विविध गावातील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे पाणी घरात शिरून घरांचे मोठे नुकसान झाले.

प्राध्यापकांचे प्रसंगावधान

नागझिरी नदीला अचानक पूर आल्यामुळे ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाचे प्रा. एस. बी. महाजन व त्यांच्या पत्नी अर्चना महाजन हे दोघे आपल्या वॅगनार कारने रावेरहून ऐनपूरकडे जात असताना अजंदे गावाजवळ नदीचे पाणी अचानक वाढल्यामुळे कार पाण्यात असल्यामुळे दोघांनी तत्काळ प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप आले. मात्र थोड्याच वेळात त्यांची कार नदीच्या पुरात वाहून गेली.

वाहतूक ठप्प

तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्य महामार्गावर वडगाव जवळच्या नाल्याला पाणी आल्यामुळे सुमारे एक ते दीड तास ठप्प झाला होता तर रावेर, अजंदा, निंबोल, विटवा, ऐनपूर, रावेर -नेहेते, दोधे, रावेर भाटखेडा, उटखेडा – चिनवल, उटखेडा कुंभारखेडा, सावदा थोरगव्हाण, अभोडा रावेर, पातोंडी – निंभोरासीम यासह अनेक गावांचा सपर्क तुटला. यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीच्या दुतर्फा वाहने अडकून पडली होती.

शेतात पाणी

आज तब्बल साडेचार ते पाच तास पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. पुन्हा पाऊस आल्यास खरिपांची पिके सडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील पाराचा गणपती मंदिर या भागात पाणी साचले होते. तसेच तहसील कार्यालय पोलिस ठाणे या भागातही पाणी साचले होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने