भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी२० मध्ये पाऊस ठरू शकतो ‘व्हिलन’; जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना आज होणार आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर या सामन्यासाठी दोन्ही संघ भिडतील, परंतु या सामन्यापूर्वी हवामानाबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी शनिवारी येथे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण मैदान पाण्याने भरल्याचे दिसून आले. खेळपट्टी झाकलेली असली तरी चिंतेची बाब म्हणजे रविवारीही पावसाची शक्यता आहे.

तिरुअनंतपुरममध्ये रविवारी सकाळीही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार दुपारपर्यंत पावसाची शक्यता ५५ टक्के आहे. या काळात गडगडाटी वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु संध्याकाळी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो मात्र पुढील २४ तास राज्यात हवामान खराब राहण्याचे संकेत आहेत.

टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आपली पहिली द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. मात्र, संघातील अव्वल खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव टी२० मालिकेचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २ गडी राखून पराभव केला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वत: चमकदार कामगिरी करत ८० धावांची दमदार खेळी केली. मात्र, या सामन्यात संघाची गोलंदाजी चिंतेचा विषय ठरली आणि ती चांगलीच महागात पडली. मुकेशशिवाय अन्य कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही.

अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या टी-२० सामन्यात त्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा प्रयत्न करेल आणि सलग दुसरा विजय नोंदवून मालिकेत आपली आघाडी अधिक मजबूत करेल, अशी भारतीय क्रिकेटरसिकांना आशा आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील