जरांगे पाटील उपोषणावर आणि मंत्री नाचतायत रस्त्यावर, संजय राऊत यांचे जहाल टीकास्त्र

मराठा आरक्षणाचा मुद्दा, लोकशाहीची रोज होत असलेली गळचेपी यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, “माझ्या माहितीप्रमाणे दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील. याचा अर्थ असा आहे की, मंगळवारी जो सरकारने फसवणुकीचा प्रकार केला 10 टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली. सरकार त्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरलेले आहे. अशावेळी उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहेत का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचतायत रस्त्यावर. जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे, मराठा समाज अस्वस्थ आहे हे असे नाचून प्रश्न सुटणार आहेत का?”

एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ खोटी आहे. बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी अनेकदा शपथ घतेलेली आहे. या लोकांनी आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून कितीवेळा शपथ घेतलेली आहे. बाळासाहेबांच्या समाधीसमोर, बाळासाहेबांच्या मातोश्रीवर खुर्चीसमोर उभं राहून यांच्या शपथांवर काय विश्वास ठेवताय? अशी टीका राऊत यांनी केली.

शेतकरी आंदोलनाबाबत संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मिनीमम सपोर्ट प्राईज (किमान हमी भाव) हा त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा हा देशभरातला आहे. मी दोन दिवस दिल्लीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी चर्चा केली. एमएसपी संदर्भात ज्या पाच शेतमालाविषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे तो शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी ते योग्य नाही. कापूस असेल, उडीद असेल, मका असेल, महाराष्ट्रात द्राक्ष आहे, कांदा आहे , कापूस आहे, महाराष्ट्रातील शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. देशातल्या राज्यांनुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादने वेगळी आहेत. अशावेळी देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावे आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकरी जरी बॉर्डर ओलांडून पुढे गेले तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं