जळगावात जुन्या भांडणातून तरुणाची हत्या ! समतानगर येथील घटना.

जळगाव – :जुन्या भांडणातून एका -२६ वर्षे तरुणाचा कोयता व चॉपरने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडी जवळ आज सायंकाळी घडली असून या घटनेत इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अरुण बळीराम सोनवणे (वय-२६) रा.समता नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सूत्रांची माहिती अशी की, अरुण सोनवणे याचे काही दिवसांपासून त्याच परिसरात राहणारे इतर तरुणांसोबत किरकोळ भांडणाचा वाद असल्याने या वादाची ठिणगी आज सकाळी पडली. त्यानंतर हा वाद काही तरुणांच्या मदतीने मिटवण्यात आला.

समता नगर परिसरात राहणाऱ्या अरुण बळीराम सोनवणे, चुलत भाऊ आशिष संजय सोनवणे, गोकुळ बळीराम सोनवणे या तिघांवर रविवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या सुमारास वंजारी टेकडी परिसरात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने दोघांना नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अरुण सोनवणे याला मृत घोषित केले. तर आशिष यास खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईक आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून तीन संशयितांची नावे समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह कर्मचारी पोहचले असून संशयितांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, मयत अरुण सोनवणे याच्यावर पूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता मात्र काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.

ही घटना घडल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मयताच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. , यावेळी रामानंदनगर आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh