इंदौरचा राजा रघुवंशी खूनप्रकरण: पत्नी सोनमची चिताडखोर योजना, प्रेमासाठी पतीची निर्घृण हत्या

इंदौरमध्ये नुकतीच घडलेली राजा रघुवंशी खून प्रकरण देशभर गाजत आहे. या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले असून, ही योजना कोणी आणि का केली हे समजल्यावर पोलिसही हादरले.

राजा रघुवंशीची हत्या त्याच्या पत्नी सोनमच्या डोळ्यांदेखत झाली. पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, सोनमनेच हे संपूर्ण कट रचला होता आणि तीच मुख्य सूत्रधार होती. हत्या करताना सोनम ओरडली होती – “मार दो इसे!”

प्रेमासाठी पतीचा काटा काढला

सोनम आणि राज कुशवाहा यांच्यात गेल्या ५ महिन्यांपासून अफेअर होते. सोनमच्या वडिलांना हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळे आणि समाजाच्या दबावामुळे तिने राजा रघुवंशीशी लग्न केलं, पण आधीपासूनच तिचा मनसुबा पतीला संपवून राजसोबत राहण्याचा होता. सोनमने राजला सांगितले होते की, “जेव्हा मी विधवा होईन, तेव्हा आपण लग्न करू.”

१६ मे रोजी रचला कट

राजा आणि सोनमचा विवाह ११ मे रोजी झाला आणि १६ मे रोजी शिलाँग येथे हत्या करण्याची योजना तयार करण्यात आली. प्रेमी राजने आपल्या मित्र विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना यात सामील करून घेतले. सोनमला रात्री सहा तास फोनवरून संपूर्ण योजना समजावण्यात आली.

राजने आरोपींना ५० हजार रुपये, एक कीपॅड फोन, अँड्रॉइड मोबाईल आणि नवीन सिम दिली. सोनम याच नंबरवरून शिलाँगमध्ये आरोपींशी सतत संपर्कात होती.

राज इंदौरमधून देत होता सूचना

राजने स्वतः न जाता आरोपींसाठी शिलाँगची तिकिटं काढली आणि इंदौरमधूनच त्यांना सूचना देत राहिला. एवढंच नव्हे, तर तो राजा रघुवंशीच्या अंतिम संस्कारातही सहभागी झाला.

खूनाच्या दिवशी काय घडलं?

२३ मे रोजी, सोनमने फोटोशूटच्या बहाण्याने राजाला एका सुनसान डोंगराळ ठिकाणी नेलं. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, त्या दिवशी अपरा एकादशी होती आणि सोनमने व्रत केलं होतं. परंतु त्याच दिवशी तिने पतीचा काटा काढला.

एक आरोपी म्हणाला, “डोंगर चढताना आम्ही थकलो होतो, मारायला जमणार नाही असं म्हणालो, तेव्हा सोनमने सांगितलं – ‘२० लाख रुपये देते, मारावं लागेल!’”

हत्या आणि नंतरचं भीषण वास्तव

राजावर ‘डाव’ या हत्याराने हल्ला झाला. जबर मारहाणीनंतर तो अर्धमेलाच होता. आरोपींनी सांगितले की, राजा जिवंत असतानाच त्याला खाईत फेकले गेले. इतकंच नाही, सोनमनेच त्याला ढकलून खाली फेकलं.

सोनमने आरोपींना पैसे राजा रघुवंशीच्या वॉलेटमधूनच दिले – फक्त १५,००० रुपये. आरोपीनं पैसे कमी असल्याचं सांगितल्यावर तिने आश्वासन दिलं की, “पुढचे पैसे लवकरच मिळतील.”

पोलिसांनी सांगितलं की, हत्येनंतर आरोपी राजा-सोनमची अ‍ॅक्टिवा २५ किमी दूर सोडून परतले आणि सोनमने वापरलेला मोबाईल फोन फोडून फेकून दिला.

अटक कशी झाली?

राज कुशवाहा अटकेत आल्यावर सोनम खचली. ती वाराणसी, मग गाझीपूरला गेली. एका ढाब्यावाल्याचा फोन वापरून तिने घरी फोन केला, आणि त्यावरून पोलिसांनी तिला पकडलं.

राजा रघुवंशीचा खून म्हणजे केवळ एक कौटुंबिक भांडण नव्हे, तर एक पूर्णपणे नियोजित, प्रेमाच्या नावावर रचलेला थरारक कट होता. सोनमसारख्या शिक्षित तरुणीने इतक्या थंडपणे पतीचा काटा काढणं हे समाजासाठीही धोक्याचं संकेत आहे. पोलिस तपास पुढेही सुरू असून, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

ताजा खबरें