“माझा जन्म झालेला नाही, मला देवानेच पाठवले”, पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना तिसऱ्या टर्ममध्ये ते काय काम करणार आहेत, याची माहिती देत होते.

तुम्ही थकत का नाहीत? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर मोदी म्हणाले, ‘मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे.’ पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देवानेच मला पाठवले, माझी मानवी शरीर नाही

पंतप्रधान मोदी यांनी १४ मे रोजी वाराणसी लोकसभेसाठी अर्ज भरला होता. यावेळी त्यांनी न्यूज १८ इंडिया या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, ‘माझी आई जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचे की, माझा जन्म झाला असावा. पण आईच्या जाण्यानंतर मी सर्व अनुभवांना एकत्रित करून पाहतो, तेव्हा मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, देवानेच मला पाठवले आहे. माझ्यातील ऊर्जा ही मानव शरीरातून मिळालेली नाही. ही ऊर्जा देवानेच मला दिली असून त्यामाध्यमातून त्याला काहीतरी काम करून घ्यायचे आहे. यासाठीच मला सामर्थ्यही प्रदान केले आहे. तसेच मला पुरुषार्थ गाजविण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा देवाकडूनच मिळत आहे. मी काही नी तर देवाचे साधन आहे. देवाने माझ्या रुपातून काहीतरी काम करणे ठरविले आहे. त्यामुळेच परिणामांची चिंता न करता मी काम करत जातो.’

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, ‘माझ्या या विधानावर डाव्या विचारांचे लोक टीका करू शकतात. पण माझ्या मनाला मात्र ही गोष्ट पटली आहे. मीही एक पुजारी आहे, एक भक्त आहे. मी भारतातील १४० कोटी लोकांना देवाचे रुप मानतो. माझ्यासाठी तेच देव आहेत.’

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.

दगडफेकीप्रकरणी ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल, १४ जणांना अटक

जामनेर –  येथील जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक केल्याप्रकरणी व पोलिसांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकूण ३००

वकीलपत्र घेण्यावरून न्यायालयात तुफान हाणामारी; शहर पोलिसात परस्पर विरोधात तक्रार दाखल

जळगाव – शिवाजीनगर परिसरासह वेगवेगळ्या भागात गोमांस विक्रीप्रकरणी अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर एका गटाने वकीलाला धमकल्याप्रकरणी तसेच वकीलपत्र घेण्यावरून