राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर तीन टक्के, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात कोरोना, एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने निवेदन करावे, अशी सूचना उपसभापती नीलम गोऱहे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील रुग्ण संख्या आणि उपाययोजनांबाबतची माहिती परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत एच1एन1 बाधितांची संख्या 405 इतकी आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर एच3एन2 बाधित रग्णांची संख्या 195 असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 308 इतकी आहे. राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांची आढावा बैठक घेतली. जनजागृतीबरोबरच राज्यात 4 हजारपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱयांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर, आजारी, वृध्द, यांना आरोग्य कर्मचारी यांना मोफत लसीकरण केले आहे. प्रत्येक जिह्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरण, बूस्टर डोस देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आदेश दिले आहेत. लस घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी वितरीत केला आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजनचा पुरेसा साठा

राज्यात 523 ऑक्सिजन प्लांट असून 552 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते. 370 एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टॅंक, 56 हजार 551 जम्बो सिलिंडर, 20 हजार छोटे सिलिंडर्स, 1 हजार डयुरा सिलिंडर्स आहेत. उपचारांसाठी 1 हजार 588 कोरोना रुग्णालये आहेत. विलगीकरण खाटा 51 हजार 365, ऑक्सिजन बेड 49 हजार 396, आयसीयू बेड 14 हजार 395 तर व्हेटींलेटर बेड 9 हजार 236 आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील