ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील धान्यांसह जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. या नागरिकांच्या मदतीला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील धावून आले. नुकसानग्रस्त कुटुबियांना एक महिन्याच्या किराण्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांना मदतीचा हात दिला.
गेल्या महिन्यात जळगाव शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात ममुराबाद येथील खंडेरावनगर भागातील चार घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे गरिब कुटुंबाच्या घरातील धान्य ओलं झालं होतं. यामुळे या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवलं होतं. या संकटात ना.गुलाबराव पाटील त्यांच्या मदतीला धावून आले.
पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, सरपंच हेमंत चौधरी, माजी सरपंच महेश चौधरी, संतोष कोळी, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, माजी सदस्य शरद पाटील, राहुल ढाके, यांनी पालकमंत्र्यांच्यातर्फे सर्व नुकसानग्रस्त कुटुबांना तेल, साखर, शेंगदाणे, पीठासह एक महिन्याचा किरणा व जीवनावश्यक वाटप करण्यात आले.