गिरीश भाऊ ,वागणे बरे नव्हे!  शिवराम पाटील     

जळगाव-: जिल्ह्यातील जामनेर चे आमदार मा.गिरीश महाजन शिंदे सरकार मधे ग्रामविकासमंत्री झाले.आम्हाला आनंद झाला.आमचे गिरीश भाऊ आता झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत कारभारावर नियंत्रण ठेवतील.अशी आमची आशा होती.म्हणून प्रत्यक्ष भेट घेऊन कैफियत मांडली.जळगांव जिल्ह्यातील ग्रामविकास खाते भ्रष्टाचारात अव्वल आहे. जिल्ह्यातील तक्रारदार आणि ग्रामविकास खात्याचे चोर अधिकारी आमनेसामने बसून तक्रारींचा निपटारा करावा.दोषींवर तेथेच ,त्याच क्षणी कारवाई करावी.

अशीच तक्रार माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांचेकडे केली होती.त्यांचा सत्तेचा रथ जमीनीपासून चार अंगुळे वर चालत होता.हे कोण?आमच्या कमाईच्या आड येत आहेत. टाका यांना जेलमध्ये.नंतर त्यांचा सत्ते चा रथ भोसरी च्या चिखलात रूतला.ते खाली उतरले.तेंव्हा बाणवर्षाव चालू ठेवला.म्हणाले ,माझा रथ रूतला आहे.थांबा.बाण मारू नका.कोणीच थांबले नाहीत.म्हणाले ,योद्धा रथावरून खाली उतरला आहे. तर त्याचेवर शरसंधान करू नये.हे धर्माच्या विरोधात आहे.तेंव्हा, खडसेंना उत्तर मिळाले,राधासुता तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?

आता आमचे ग्रामविकासमंत्री मा.गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले कि,साहेब, ग्रामविकास खात्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे, चालू आहे.त्याची जबाबदारी तुमची आहे.किमान जळगाव जिल्ह्यातील तरी हप्तेबाजी बंद करा.डाकिणसुद्धा एक घर सोडून देते.तसा तुम्ही जळगाव जिल्हा तरी सोडा.हे तुमचे होमग्राऊंड आहे.किमान जिल्ह्यातील तक्रारी आमनेसामने बसून निपटारा करा.सीईओ ,बीडीओ घाऊक प्रमाणावर भ्रष्टाचार करीत आहेत.याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरतो.

गिरीश महाजन यांनी हो तर म्हटले पण अजून त्यांनी तशी तयारी दाखवली नाही.कदाचित आम्ही जिल्ह्यातील मतदारांचे शोषण होणे त्यांना खटकत नसावे.कदाचित जिल्ह्यातील , जामनेर मधील मतदारांची त्यांना कधीच गरज पडणार नाही.त्यांना गरज आहे,झेडपी नोकरांची.त्यांचेच मतांनी गिरीश महाजन पुन्हा आमदार बनतील,असा त्यांना विश्वास आहे.म्हणून नाशीक येथील सम्मेलनाचे उद्घाटन गिरीश महाजन करणार आहेत.त्यांना आशिर्वाद देणार आहेत.त्यांना संदेश देणार आहेत.त्यांना अभय देणार आहेत.तुम्ही लुटमार चालू ठेवा.मी तुमच्या पाठीशी आहे.येऊन जाऊन तक्रार माझ्याकडे येईल.कारवाई करणे अथवा न करणे माझ्या हाती आहे.

या कृतीबद्दल आम्ही गिरीश महाजन यांना दोषी ठरवत आहोत.तसा आमचा वैधानिक अधिकार आहे.आम्ही जिल्ह्यातील नागरिकांनी , मतदारांनी गिरीश महाजन यांना आमदार निवडून दिले.आणि तेच मतदारांच्या, नागरिकांच्या विरोधात जात आहेत.असे आजचे वास्तव आहे.गिरीश भाऊ,सत्ता येते जाते.संपत्ती येते जाते.पण मतदारांची अवहेलना केली, प्रतारणा केली तर खडसेंसारखी दैना होऊ शकते.म्हणून म्हणतो,हे वागणे बरे नव्हे!

शिवराम पाटील                                  ९२७०९६३१२२                                              महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

राज्यात आता दोन दिवस पावसाचे! कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

मॉन्सूनने आता पूर्ण राज्य व्यापले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार 15 जूनपर्यंत मॉन्सूनने राज्य व्यापले असून आता त्याचा पुढील प्रवास वेगाने

सुनसगाव विद्यालयात अनोख्या आदर्श पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – ग्रामिण भागात बैलगाडी हे वाहन म्हणून सहसा कोणी वापर करीत नाही बालकांपासून तर वयोवृद्धांना

बद्रीनाथमध्ये 23 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

रुद्रप्रयाग  – बद्रीनाथ इथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर उलटून भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ

विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले

राज्यात आता दोन दिवस पावसाचे! कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

मॉन्सूनने आता पूर्ण राज्य व्यापले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार 15 जूनपर्यंत मॉन्सूनने राज्य व्यापले असून आता त्याचा पुढील प्रवास वेगाने

सुनसगाव विद्यालयात अनोख्या आदर्श पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – ग्रामिण भागात बैलगाडी हे वाहन म्हणून सहसा कोणी वापर करीत नाही बालकांपासून तर वयोवृद्धांना

बद्रीनाथमध्ये 23 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

रुद्रप्रयाग  – बद्रीनाथ इथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर उलटून भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ

विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले

रशियामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे पार्थिव परिवाराच्या ताब्यात

जळगाव – जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले होते चार जून रोजी मंगळवारी रात्री घरी बोलल्यानंतर बोलत असताना वोल्खोव्हा नदीच्या

मान्सूनबाबत IMD कडून धडकी भरवणारी अपडेट ;  शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, काय आहे वाचा

जळगाव – दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. यामुळे विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील

ECHS भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, 8वी ते पदवीधरांना संधी..

भुसावळ – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना(ECHS) भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. आठवी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारला दिली एक महिन्याची डेडलाईन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील

धक्कादायक !  दिव्यांग पतीला विहिरीत ढकलत केला खून; पत्नीविरुद्ध गुन्हा

धरणगाव – शेतातील मंदिरात मुंजोबा देवाच्या पाया पडण्याच्या बहाण्याने घेऊन जात दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक घटना

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर ; नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ

जळगाव – पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून