गिरीश भाऊ ,वागणे बरे नव्हे!  शिवराम पाटील     

जळगाव-: जिल्ह्यातील जामनेर चे आमदार मा.गिरीश महाजन शिंदे सरकार मधे ग्रामविकासमंत्री झाले.आम्हाला आनंद झाला.आमचे गिरीश भाऊ आता झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत कारभारावर नियंत्रण ठेवतील.अशी आमची आशा होती.म्हणून प्रत्यक्ष भेट घेऊन कैफियत मांडली.जळगांव जिल्ह्यातील ग्रामविकास खाते भ्रष्टाचारात अव्वल आहे. जिल्ह्यातील तक्रारदार आणि ग्रामविकास खात्याचे चोर अधिकारी आमनेसामने बसून तक्रारींचा निपटारा करावा.दोषींवर तेथेच ,त्याच क्षणी कारवाई करावी.

अशीच तक्रार माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांचेकडे केली होती.त्यांचा सत्तेचा रथ जमीनीपासून चार अंगुळे वर चालत होता.हे कोण?आमच्या कमाईच्या आड येत आहेत. टाका यांना जेलमध्ये.नंतर त्यांचा सत्ते चा रथ भोसरी च्या चिखलात रूतला.ते खाली उतरले.तेंव्हा बाणवर्षाव चालू ठेवला.म्हणाले ,माझा रथ रूतला आहे.थांबा.बाण मारू नका.कोणीच थांबले नाहीत.म्हणाले ,योद्धा रथावरून खाली उतरला आहे. तर त्याचेवर शरसंधान करू नये.हे धर्माच्या विरोधात आहे.तेंव्हा, खडसेंना उत्तर मिळाले,राधासुता तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?

आता आमचे ग्रामविकासमंत्री मा.गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले कि,साहेब, ग्रामविकास खात्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे, चालू आहे.त्याची जबाबदारी तुमची आहे.किमान जळगाव जिल्ह्यातील तरी हप्तेबाजी बंद करा.डाकिणसुद्धा एक घर सोडून देते.तसा तुम्ही जळगाव जिल्हा तरी सोडा.हे तुमचे होमग्राऊंड आहे.किमान जिल्ह्यातील तक्रारी आमनेसामने बसून निपटारा करा.सीईओ ,बीडीओ घाऊक प्रमाणावर भ्रष्टाचार करीत आहेत.याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरतो.

गिरीश महाजन यांनी हो तर म्हटले पण अजून त्यांनी तशी तयारी दाखवली नाही.कदाचित आम्ही जिल्ह्यातील मतदारांचे शोषण होणे त्यांना खटकत नसावे.कदाचित जिल्ह्यातील , जामनेर मधील मतदारांची त्यांना कधीच गरज पडणार नाही.त्यांना गरज आहे,झेडपी नोकरांची.त्यांचेच मतांनी गिरीश महाजन पुन्हा आमदार बनतील,असा त्यांना विश्वास आहे.म्हणून नाशीक येथील सम्मेलनाचे उद्घाटन गिरीश महाजन करणार आहेत.त्यांना आशिर्वाद देणार आहेत.त्यांना संदेश देणार आहेत.त्यांना अभय देणार आहेत.तुम्ही लुटमार चालू ठेवा.मी तुमच्या पाठीशी आहे.येऊन जाऊन तक्रार माझ्याकडे येईल.कारवाई करणे अथवा न करणे माझ्या हाती आहे.

या कृतीबद्दल आम्ही गिरीश महाजन यांना दोषी ठरवत आहोत.तसा आमचा वैधानिक अधिकार आहे.आम्ही जिल्ह्यातील नागरिकांनी , मतदारांनी गिरीश महाजन यांना आमदार निवडून दिले.आणि तेच मतदारांच्या, नागरिकांच्या विरोधात जात आहेत.असे आजचे वास्तव आहे.गिरीश भाऊ,सत्ता येते जाते.संपत्ती येते जाते.पण मतदारांची अवहेलना केली, प्रतारणा केली तर खडसेंसारखी दैना होऊ शकते.म्हणून म्हणतो,हे वागणे बरे नव्हे!

शिवराम पाटील                                  ९२७०९६३१२२                                              महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तिघांकडून अत्याचार

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

जळगाव : फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर तिघांकडून अत्याचार

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन जणांनी नैसर्गिक व

18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, खासदार घेणार शपथ

नवी दिल्ली – निवडणुकीत NDA ने बहुमत मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत ना संविधान चालले ना हिंदुत्व : जयसिंग वाघ 

अमळनेर :- नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी तर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील असा नारा

नात्याला कलंक! वडीलधाऱ्या माणसांनीच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : विद्येचे माहेरघर, शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून पुणे  नावारुपास आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने

Video : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना वाटले पैसे ; सुषमा अंधारेंच्या ट्विटने खळबळ

जळगाव – नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार असून यानिमित्त काल शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन! लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात

एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात  दिवसेंदिवस नवनवीन उलगडे होत आहेत. अशातच आज होणारी

आमदार मंगेश चव्हाण यांना जिवे ठार मारण्याची धमकी

चाळीसगाव – लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे . चाळीसगाव हे सत्ता

10 वर्षे तुरुंगवास ते १ कोटी दंड; पेपरफुटी विरोधी कायद्यात काय आहे तरतूद?

नवी दिल्ली – पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यम प्रतिबंधक) कायदा, 2024 देशात लागू झाला आहे. केंद्राने

तेलंगणमधील 47 लाख शेतकऱ्यांचे 31 हजार कोटींचे कर्ज माफ; राहुल गांधी म्हणाले, जे बोललो ते करून दाखवलं

तेलंगणमधील काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टच्या आधीच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा दिला आहे.