केवळ 2000 रुपये मुद्रांक‎ शुल्क भरून भावांनी केली शेतीची अदलाबदल‎

चाळीसगाव – तालुक्यातील वाघळी‎ येथील दोघा भावांची शेती बारा‎ वर्षांपेक्षा जास्त कालावधींपासून‎ परस्परांच्या ताब्यात होती. ती शेती‎ एकमेकांच्या नावावर झालेली‎ नव्हती. राज्य शासनाच्या सलोखा‎ योजनेंतर्गत आठ हेक्टर ३१ आर‎ शेतीची अदलाबदल केवळ दोन‎ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरुन‎ झाली आहे. त्यांना २ लाख ४५‎ हजार १७० रुपयांची सवलत‎ मिळाली.

सलोखा योजनेचा लाभ‎ घेणारे ते जिल्ह्यातील पहिले‎ शेतकरी कुटुंबीय ठरले आहेत.‎ शेतजमिनीचा ताबा व ‎ ‎ वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील‎ बारा वर्षांपासूनचे आपसी वाद मिटवण्यासाठी व सौहार्द वाढीस ‎ ‎ लागण्यासाठी महसूल विभागातर्फे ‎ ‎ राज्यात ‘सलोखा योजना’‎ राबवण्यात येत आहे. या‎ योजनेंतर्गत शेतजमीनधारकांच्या ‎ अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक‎ शुल्क व नोंदणी शुल्क प्रत्येकी ‎ ‎ नाममात्र एक हजार रुपये ‎आकारण्याची सवलत देण्यात येत ‎ आहे. शेतीच्या वादाबाबतचे‎ विविध प्रकरणे न्यायालयांत‎ वर्षानुवर्षे प्रलंबीत आहेत. मालकी‎ हक्काबाबतचे वाद, शेताच्या‎ बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या‎ ताब्याबाबतचे वाद, शेतीवरील‎ अतिक्रमणावरुन होणारे वाद,‎ अधिकार अभिलेखातील‎ चुकीच्या नोंदी या कारणांमुळे‎ शेतकऱ्यांमध्ये वाद आहेत.‎ त्यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान‎ झालेले आहे .

असे वाद संपुष्टात येवून सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना‎ राबवण्यात येत आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील‎ शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या‎ शेतकऱ्याच्या नावावरील शेतीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे‎ असणाऱ्या शेतकऱ्यांचे अदलाबदल दस्तांसाठी ही सवलत‎ देण्यात येत आहे. अकृषक, रहिवासी व वाणिज्यिक वापराच्या‎ जमिनीसाठी ही योजना लागू नाही.‎

अशी झाली शेतीची अदलाबदल : वाघळी येथील रमेश‎ एकनाथ भोळे, पोपट एकनाथ भोळे व सुरेखा पोपट भोळे‎ यांच्यात ८ हेक्टर ३१ आर शेतीची अदलाबदल झालेली आहे.‎ त्यासाठी नियमानुसार त्यांना शेतीच्या बाजारमूल्यानुसार दुय्यम‎ निबंधक कार्यालयात २ लाख ४५ हजारावर मुद्रांक शुल्क तसेच‎ दस्त नोंदणी फी भरावी लागली असती. सलोखा योजनेचा लाभ‎ मिळाल्याने केवळ दोन हजार रुपये मुद्रांक शुल्क भरुन भोळे‎ कुटुंबीयांत शेतीची अदलाबदल झाली आहे.‎

ताजा खबरें