जी-२० परिषदेमुळे दिल्लीतील सुरक्षा चोख; नागरिकांनी छतावर देखील येऊ नये, पोलिसांचा आदेश

दिल्ली – जी-२० परिषदेसाठी जगभरातील अनेक देशांचे नेते भारतात आले आहेत. ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबरला नवी दिल्लीत या नेत्यांची शिखर परिषद पार पडणार आहे. जी-२० शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत जोरदार तयारी सुरु आहे.

परदेशी पाहुण्यांच्या आगमनासाठी सजावट करण्यात आली असून रस्त्यांवर रोशनाई देखील लावण्यात आली आहे. मात्र, यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे. पोलिसांना दिल्लीतील लोकांना छतावर देखील न जाण्याचे आदेश दिले आहेत.

जी-२० शिखर परिषदेची जय्यत तयारी सुरु आहे. काही दिवसांपुर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरुन उचलून बंदिस्त ठिकाणी डांबण्यात आलं होतं.

त्यानंतर दिल्लीमधील झोपडपट्टी भाग जागतिक नेत्यांना दिसू नये यासाठी हिरव्या रंगाची शेडनेट लावण्यात आली होती. अशातचं, आपल्या घरात थांबण्याऱ्या स्थानिकांसाठी पोलिसांनी फरमान सुनावला आहे. पोलीसांनी घोषणा केली की ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी छतावर येऊ नये.
जी-२० परिषदेत जगभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहेत. .

त्यांच्या ऐवजी त्यांच्या देशाचे प्रतिनिधी सामील होतील. यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली की कोणत्या देशाचा नेता येत नाहीये याने काही फरक पडत नाही. त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला देशांची बाजू मांडता आली पाहिजे.