रामदेववाडी येथील अपघातातील कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

जळगाव – तालुक्यातील रामदेववाडी येथे मंगळवारी दि. ७ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात आशासेविकांसह तीन बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कारचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात करणाऱ्या कारमध्ये बड्या घराण्यातील तरुण असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरु असून अद्यापि कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

तालुक्यातील रामदेववाडी जवळ पठारवाडी परिसरात आशा सेविका राणी उर्फ वच्छलाबाई सरदार चव्हाण (वय ३०) यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली होती. या धडकेत राणी चव्हाण यांच्यासह त्यांची मुले सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहन सरदार चव्हाण (वय ७) यांचा मृत्यू झाला होता. तर सोबत असलेला भाचा लक्ष्मण पदमसिंग नाईक (वय १६) हा गंभीर जखमी झाला होता. मध्यरात्री १२ वाजता उपचारादरम्यान लक्ष्मण नाईक याचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला मयत वच्छलाबाई चव्हाण यांचे भाऊ राजेश अलसिंग चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची बहीण वच्छलाबाई (वय २७,रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) ह्या रामदेववाडी येथे आशा सेविका म्हणून काम करतात. मंगळवारी संध्याकाळी त्या कामकाज आटोपून शिरसोली येथे इलेकट्रीक स्कुटर (एमएच १९ ईई ८९२५) ने परत जात असताना समोरून निळ्या रंगाची इको स्पोर्ट्स कारने (एमएच १९ सीव्ही ६७६७) ने विरुद्ध दिशेने येऊन वच्छलाबाई यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वच्छलाबाई चव्हाण यांच्यासह त्यांचे दोन मुले सोमेश, सोहम व भाचा लक्ष्मण यांचा मृत्यू झाला आहे. या चौघांच्या मृत्यूप्रकरणी इकोकार वरील चालकाविरुद्ध फिर्यादीने फिर्याद दिली आहे. दरम्यान, या कारमध्ये धनाढ्य घरातील अर्णव अभिषेक कौल, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचे चिरंजीव अखिलेश संजय पवार यांच्यासह दोन अनोळखी इसम हे असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला