जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्यावर गंभीर आरोप करत मनसेच्या उमेदवाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

किनवट ता. प्रतिनिधी/ मारोती देवकते

किनवट -माहूर नगरपंचायतच्या मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून मनसेचे माहूर तालुका अध्यक्ष, वार्ड क्र 7 चे अधिकृत उमेदवार विनोद सूर्यवंशी यांनी जिल्हाध्यक्षाच्या निष्क्रिय कारभाराला वैतागून पक्षाला जय महाराष्ट्र करत आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे विनोद सूर्यवंशी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मनसेने एक सक्रिय व निष्ठावान तालुकाध्यक्ष गमावल्याची चर्चा होत आहे तर काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे
माहूर नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी तालुकाध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांनी सुरुवातीपासूनच जोरदार तयारी केली होती माहूर शहरातील अनेक वार्डात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा मोठा मतदार आहे त्यादृष्टीने वार्ड क्रमांक सात मध्ये तालुकाध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांनी स्वतः उमेदवारी अर्ज भरला तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षित जागेवर लक्ष्मी राम सोयाम यांना उमेदवारी दिली प्रचारादरम्यान मनसेच्या या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद लाभत असताना व कार्यकर्ते जोमाने प्रचार करत असताना जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मात्र प्रचाराकडे पाठ फिरविली जिल्हाध्यक्षांच्या या निष्क्रिय व हेकेखोरवृत्तीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक असताना मनसेचे तालुकाध्यक्ष व वार्ड क्रमांक 7 चे उमेदवार विनोद सूर्यवंशी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करुन आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी शिवसेना या प्रमुख पक्षाचे वरिष्ठ स्तरावरील मातब्बर नेते माहूर शहरात तळ ठोकून प्रचार करत आहेत तर आमचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड हे आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य व मदत करत नसल्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला अशी खंत विनोद सूर्यवंशी यांनी काँग्रेसप्रवेशानंतर व्यक्त केली असून जिल्हाध्यक्ष राठोड यांच्या तोंडात राज साहेबांचे नाव असले तरी ते शिवसेनेशी निष्ठा बाळगून आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला
जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या निष्क्रिय व हेकेखोर कारभाराबद्दल सुरुवातीपासूनच महाराष्ट्र सैनिकात मोठ्या प्रमाणात नाराजी होती माहूरच नव्हे तर किनवट तालुक्यात सुद्धा निष्ठावान महाराष्ट्र सैनिक व पदाधिकाऱ्यांना डावलून त्यांनी आपल्या नातेवाईकांना महत्वाची पदे देण्याचे काम केल्यामुळे किनवट तालुक्यात पक्षाची पडझड सुरू झाली आता त्यांच्या या निष्क्रिय व आडमुठे धोरणाचा फटका माहूर नगरपंचायतच्या निवडणुकीत पक्षाला बसला असून यानिमित्ताने मनसेने सक्रिय तालुकाध्यक्ष गमावल्याची चर्चा होत आहे तर विनोद सूर्यवंशी यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी प्राप्त झाली आहे
या निवडणुकीत दोन उमेदवारांपैकी एकाने काँगेस प्रवेश केल्यामुळे आता मनसेचा एकच उमेदवार निवडणूक लढवत असून पक्षावर ओढवलेल्या या नामुष्कीला जिल्हाध्यक्षच जबाबदार असल्याचे निष्ठावंत मनसैनिक बोलवून दाखवत आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं