खेडीभोकरी-भोकर दरम्यान तापी नदिवर हंगामी पुल बनवण्यात यावा.. गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

                  चोपडा (प्रतिनिधी):- तालुक्यातील खेडीभोकरी व भोकर दरम्यान तापी नदीवर दरवर्षी हंगामी लाकडी पूल बनवण्यात येत असतो. हा पुल १ जानेवारी पासून ३१ मे पर्यंत रहदारीसाठी खुला असतो. मागील वर्षी हा पूल बनवण्यात आलेला नव्हता. त्याबाबत गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी संबंधित विभागाकडे निवेदनही दिलेले होते. व त्याआशयाच्या बातम्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या होत्या. संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन नदीत दोन सिमेंटचे पाईप टाकून त्यावर मातीरेतीचा भराव करून तात्पुरता कच्चा रस्ता तयार केलेला होता. परंतु नदीत पाण्याचे आवर्तन सुटल्याने हा कच्चा रस्ता वाहून गेला होता. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागला होता. सद्यस्थितीत याठिकाणी नाव (होडी) वर वाहनांसह प्रवाशांना दोन्ही काठांवर पोहोचवितांना नावाडी बांधवांना पाण्यावरची कसरत करावी लागत असुन त्यात बसणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठित धरून जावे लागत आहे. “नवीन पक्का पुल होईल तेव्हा होईल, तोपर्यंत याठिकाणी सालाबादप्रमाणे हंगामी लाकडी पुल बनविण्यात यावा”, अशी आग्रही मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केलेली आहे.

https://youtu.be/V0OQ1HB9SjQ

विदगावच्या पुलावर ग्रामस्थं रास्तारोको करणार.. 

दि.१ जाने.२०२३ पासुन भोकरचा हंगामी पुल रहदारीस सुरू झाला पाहिजे, परंतु अजुनही येथे संबंधित विभागातर्फे लाकडी पूल बनविण्याची कार्यवाही होताना दिसत नाही. हा पुल लवकर बनवावा, अन्यथा भोकरच्या लाकडी पुलासाठी विदगावच्या पक्का पुलावर पंचक्रोशितील ग्रामस्थांतर्फे रितसर तीव्र रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहिल.

जगन्नाथ बाविस्कर, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ता.चोपडा.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील