MBBSमध्ये चारदा नापास झाल्यावर पुन्हा संधी द्या! विद्यार्थ्याची विनंती ऐकून सरन्यायाधीशा संतापले

वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या एमबीबीएस या पदवी परीक्षेत चार वेळा नापास झालेल्या एका विद्यार्थ्यावर सरन्यायाधीश चांगलेच संतापले. चार वेळा नापास होऊन त्याने पाचव्यांदा परीक्षेला बसण्याची संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा विद्यार्थी याच परीक्षेत आधी चार वेळा नापास झाला आहे. त्यानंतर पाचव्या वेळी परीक्षेला बसायची परवानगी मिळावी यासाठी त्याने ही याचिका दाखल केली होती. या विद्यार्थ्याच्या वकिलांनी याचिकेवर सुनावणी लवकर व्हावी अशी मागणी केली, तेव्हा ही सुनावणी लवकरच घेण्यात येईल, असं सरन्यायाधीशांनी त्याला सांगितलं. तरीही वकिलाने निश्चित तारीख सांगण्याची विनंती केली, तेव्हा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड संतापले.

ते म्हणाले की, आम्ही शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा हरएक प्रयत्न करत आहोत. पण, हे (याचिकाकर्ता विद्यार्थी) डॉक्टर बनू शकतील का? चार वेळा हे नापास झाले आहेत आणि पाचव्यांदा परीक्षेला बसायची परवानगी मागण्यासाठी इथ आले आहेत. आम्ही हेच काम करायला इथे बसलोय का? या सगळ्या प्रकारात गुंतण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. आपण हे काय दर्जाचे डॉक्टर बनवणार आहोत. दुसऱ्या कोणत्याही देशात ही परवानगी मिळालीच नसती, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्याच्या वकिलाने त्यावर कोरोनाचं कारण देऊन याचिकेवर सुनावणी न झाल्यास 1 हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागेल, असा युक्तिवाद केला. तेव्हा सरन्यायाधीश म्हणाले की, इतर विद्यार्थी देखील या परीक्षेला बसले होते आणि ते याच दरम्यान पास देखील झाले आहेत, असंही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं.

2019मध्ये ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन कायदा (संशोधित) पारित करण्यात आला आणि 1997मध्ये बनवलेल्या कायद्याला निष्प्रभावी करण्यात आलं होतं. या कायद्यानुसार, मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला पहिली व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फक्त चार वेळा संधी दिली जाईल. जर तो या दरम्यान उत्तीर्ण झाला नाही, तर त्याला पुन्हा परीक्षेला बसायची परवानगी मिळणार नाही.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण