भुसावळ तालुका पोलिसांनी २४ तासात केला कुऱ्हा पानाचे येथील खूनाचा उलगडा !

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे झालेल्या रखवालदार खून प्रकरणाचा तपास अवघ्या २४ तासात उलगडा केल्याने भुसावळ तालुका पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

या बाबत माहिती अशी की, संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सदाशिव राजाराम डहाके हा कुऱ्हा पानाचे येथील अण्णा शिंदे यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करत होता त्याचे कुऱ्हा पानाचे येथील खळ्यात वास्तव्य होते. दि.१४ फेब्रुवारी रोजी दिपक पितांबर पाटील हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या खळ्याच्या बाजूला असलेल्या अण्णा शिंदे यांच्या खळ्यामध्ये दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना सदाशिव राजाराम डहाके हे पलंगावर झोपलेले दिसले. त्यांनी त्यांना आवाज देऊन उठवले असता ते उठले नाहीत ते मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिपक पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन ला दिलेल्या खबरी वरुन पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

परंतु शवविच्छेदन अहवालात मृतदेहात अंतर्गत जखमा असल्याचे समजल्यावर तसेच मारहाणीची माहिती ही पोलीसांना मिळाली. या बाबत मोंढाळा ता भुसावळ येथील दूध विक्रेता अनिल संतोष धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात लक्ष्मण गणेश शिराळे रा. शेलवड ता बोदवड याच्या बाबत माहिती मिळाली. तो पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्यास मोंढाळा येथून शिताफीने अटक करण्यात आली. जून्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबनराव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोऊनि पूजा अंधारे, एक एस आय विठ्ठल फुसे, पोहेकाॅ संजय तायडे, युनूस शेख , प्रेमचंद सपकाळे, दिपक जाधव, वाल्मिक सोनवणे, आत्माराम भालेराव, रियाजोद्दीन काझी, पोना कैलास बाविस्कर, जितेंद्र साळुंखे, पोकाॅ उमेश बारी, रशिद तडवी यांनी केली. २४ तासात खूनाचा उलगडा झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी भुसावळ तालुका पोलीसांचे कौतुक केले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला