भिख्खू संघाच्या त्यागातून बौद्ध धर्म जगात अजरामर आहे : जयसिंग वाघ 

भुसावळ :- बुद्ध काळापासून भिख्खू संघ बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत आला आहे, प्रसंगी भिख्खूने आपले मरण स्वीकारले मात्र आपली निष्ठा कायम ठेवली, त्या मुळेच आज जगभरात बौद्ध धर्म अजरामर आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. पुढं आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी सांगितले की, आज भारतात बौद्ध अनुयायी संघ, कमळ, भगवा या शब्दांचा उच्चार करावयास सुध्दा घाबरतात, कोणी या शब्दांचा वापर केल्यास त्यावर टीका टिप्पणी केली जाते, बौद्ध जनतेच्या अस्मितेचे हे शब्द, प्रतीके आज बौद्ध धर्माच्या विरोधकांच्या अस्मितेचे झाले आहेत मात्र हे सर्व बौध्द धर्माची देण आहे.

२१मे रोजी भुसावळ येथील तक्षशिला नगर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करताना वाघ बोलत होते.

वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, बौद्ध धर्मात श्रामणेर वर्गाचे मोठे योगदान राहिलेले आहे गौतम बुद्ध यांचा मुलगा राहुल वयाच्या सातव्या वर्षी श्रामणेर तर विशाखा सुध्दा सातव्या वर्षी तिच्या शेकडो मैत्रिणी सोबत श्रामणेरी झाली तिच्या या कार्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला भिख्खू संघात सामील झाल्या व त्यांनी नवा इतिहास रचला मात्र अलीकडे महिलावर्ग धम्म प्रचारार्थ अत्यल्प प्रमाणात पुढं येत आहेत या बद्दल जयसिंग वाघ यांनी खंत व्यक्त केली.

सुरुवतीस श्रामणेर शिबिरात सहभागी ३६ श्रामणेरांची परिसरातून भव्य धम्म फेरी काढण्यात आली त्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुंबई येथील भंतेजी दिपंकर होते त्यांनी त्रिसरण, पंचशील घेतले, त्यांनी आशिर्वादगाथा द्वारे सर्वांना आशीर्वाद देवून मंगल कामना केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमंगल अहिरे यांनी, प्रास्ताविक प्रकाश सरदार, आभार प्रदर्शन विजय अवसरमल, स्वागत संघरत्न दामोदरे, युवराज नरवाडे, विवेक नरवाडे, परिचय रमेश सावळे, एस. पी. जोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन दिपरत्न तायडे, आश्र्विनी तायडे यांनी केले होते. कार्यक्रमास स्त्री – पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला