बांग्लादेशात हिंदूवर अत्याचार : 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद

जळगाव – बांग्लादेशातील अस्थिर वातावरणामुळे हिंदूंवर अत्याचार वाढले असून या विरोधात सकल हिंदू समाजाने एकत्रीत बैठक घेत शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रपरिषेदेत माहिती दिली. जळगाव येथील पद्मावती मंगल कार्यालयात सकल हिंदू परिषदेतर्फे शुक्रवार, 9 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्राने हिंदूंना संरक्षण द्यावे

बांग्लादेशात अनेक हिंदूंवर अत्याचार होत असल्याबाबतचे व्हिडीओ प्रसारित होत असल्याची माहिती देऊन जनार्दन हरी महाराज पुढे म्हणाले की, या प्रकरणी एक माणूस म्हणून आपण जळगाव जिल्हा शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळणार आहोत. याबाबत आम्ही आवाहन करीत आहोत तसेच केंद्र सरकारने बांगलादेश येथील हिंदूंना संरक्षण देण्याबाबत भूमिका जाहीर करावी. याबाबत केंद्र सरकारने मानवाधिकार संघटनेने भूमिका मांडावी, असेही ते म्हणाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh