अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज, मंगळवारी भारतीय जनता पक्षात (भाजपा) जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकत त्यांचे पक्षात औपचारिक स्वागत केले. तसेच त्यांच्याकडे कुठली जबाबदारी किंवा पद असेल याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व निर्णय घेईल असे सांगितले. तर भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, मी इतकी वर्षे काँग्रेससाठी काम केले. मी माझ्या 38 वर्षांच्या राजकीय प्रवासाची दिशा बदलतोय. मी आज भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन या देशात आणि राज्यात चांगले काम करता आले पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल करता आली पाहिजे, राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत आपले योगदान असले पाहिजे, अशी माझी भावना आहे. याच प्रामाणिक भूमिकेतून मी आज भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगितले. नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस विरोधात होते. तेव्हापासून आम्हाला एकमेकांच्या कामांचा अनुभव आहे. त्या काळातही आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. काही सहकाऱ्यांच्या तक्रारी होत्या, त्या तक्रारी मी मान्य करेन. मी नेहमीच आमच्या जिल्ह्याला, मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीसही त्यासाठी सकारात्मक होते असे चव्हाण म्हणाले.

भाजपा प्रवेशावरून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. मला कोणावरही व्यक्तीगत टिकाटिप्पणी करायची नाही. पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलतात, टिकाटिप्पणी करतात, तर काहीजण समर्थन करत आहेत. लोकांमध्ये मतभिन्नता असू शकते. परंतु, व्यक्तीगत स्वरुपाचे दोषारोप मी कधी कोणावर केले नाहीत. आताही मी तसे काही करणार नाही. आजपासूनच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला लागल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला