रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ‘बाजीगर’चे उत्तर

बारावी परीक्षेचा निकाल 25 मे रोजी लागला. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणे ही एक मोठी डोकेदुखी असते. याचं कारण म्हणजे उत्तरं येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून होणारी फेकाफेकी. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की लांबलचक उत्तरं लिहिली तर जास्त मार्क मिळतील. मात्र खरी बाब अशी आहे की उत्तर छोटे असो अथवा मोठे. त्यात विषय समजला असल्याचे प्रदर्शन झाले तरच मार्क मिळतात. फेकाफेकी असल्यास भोपळा मिळतो. अनेकदा अशी फेकाफेकी केलेली उत्तरं वाचून उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांचेही मनोरंजन होते.

उत्तरं येत नसली की विद्यार्थी पेपरमध्ये चित्रपटाच्या कहाण्या लिहितात, कधी गाणी लिहितात तर कधी शेरो-शायरीपण लिहितात. रत्नागिरी बोर्डात तपासणीचे काम करणाऱ्या सुरेश जोशी यांच्याकडे छत्रपतीसंभाजीनगर मधल्या बारावीच्या विद्यार्थ्याचा पेपर तपासणीसाठी आला होता. रसायनशास्त्राची उत्तरे फार मोठी नसतात. मात्र या विद्यार्थ्याने एक उत्तर लांबलचक लिहिलं होतं. उत्सुकता म्हणून जोशी यांनी ते वाचलं असता त्यांना ती एक कथा असल्याचं कळालं. पेपर तपासल्यानंतर ही कथा एका चित्रपटाची असून या चित्रपटाचे नाव बाजीगर असल्याचं कळालं. या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोल असल्याची उपयुक्त माहितीही जोशी यांना मिळाली. या विद्यार्थ्याने अडीज पाने भरून या प्रश्नाचं उत्तर लिहिलं होतं, मात्र तरीही त्याला शून्य मार्क देण्याशिवाय जोशी यांच्यासमोर पर्याय नव्हता.

कधीकधी विद्यार्थी पेपर तपासणाऱ्यांना खूश करण्यासाठी पेपरमध्ये नोटा ठेवतात. कधी या नोटा 100 च्या असतात, कधी 200 च्या तर कधी 500 च्या असतात. मुकुंद आंधळकर कनिष्ठ महाविद्यालय महासंघाचे समन्वयक आहेत. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या एका पेपरमध्ये विद्यार्थ्याने या विषयात नापास होण्यापासून आता मला फक्त देवच वाचवू शकतो असं लिहिलं होतं. त्याने मुक्त हस्ताने आपल्याला मार्क द्या असं आवाहनही केलं होतं. ज्या प्रश्नांची उत्तरं लिहिली नव्हती त्यांनाही मार्क देण्याचे या विद्यार्थ्याने आवाहन केलं होतं.

काही विद्यार्थी हे पेपरच्या पहिल्या आणि शेवटच्या पानावर श्लोक किंवा मंत्र लिहितात, मात्र योग्य उत्तरं न दिल्याने ते नापास होतात. काही विद्यार्थी हे तपासणी करणाऱ्याला उत्तीर्ण न केल्यास बरंवाईट करण्याची धमकी देतात. एका विद्यार्थ्याने लिहिलं होतं, जर मला उत्तीर्ण केलं नाही तर जीव देईन अशी धमकी दिली होती.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं