अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये फक्त एक पेपर लीक झालेला नाही. तर आतापर्यंत जेवढ्या परिक्षा झाल्या तेवढे पेपर लीक झाले आहेत. देशात सर्वांत महत्त्वाच्या परिक्षांचे देखील पेपर लीक झाले. परंतु, परिक्षांचे पेपर लीक कसे होत आहेत? तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा नाही आणि युवकांचं भविष्य उज्ज्वल करायचे नाही यासाठी मोदी सरकार पेपर लीक करतंय, असा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर केला. लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषावर केलेल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत विविध विषयांवर भाष्य केलं.

गेल्या दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रात माफियांचा जन्म झाला आहे. यांनी भविष्यातील युवकांच्या आकांक्षाना विष दिले आहे. सरकार हे निराशाचे प्रतीक नाही तर आशेचे प्रतीक असले पाहिजे. जनता आता तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही. पुढच्या महिन्यात होणाऱ्या परिक्षांचे पेपर लीक न होण्याची सरकार गॅरंटी देणार का? असा सवालही यावेळी अखिलेश यादव यांनी केला.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची दोन वेळा सत्ता आली. त्याच उत्तर प्रदेशसोबत किती भेदभाव करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये जे महामार्ग तयार होत आहेत, ते राज्याच्या तिजोरीतला पैसा वापरून तयार केले जातायत. दिल्लीमधून अद्याप एकही राष्ट्रीय महामार्ग देण्यात आलेला नाही. तसेच, अखिलेश यादव ईव्हीएमवर बोलताना म्हणाले की, माझा आजही व उद्याही ईव्हीएमवर विश्वास नाही. जरी मी 80 जागा जिंकलो, तरी ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही. मी ईव्हीएमने जिंकून ईव्हीएम हटविण्यासाठी प्रयत्न करणार. जोपर्यंत ईव्हीएमचा मुद्दा मार्गी लागत नाही. तोपर्यंत समाजवादी लोकं सरकारला जाब विचारत राहणार, असे अखिलेश यादव म्हणाले.

”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गावे दत्तक घेतली होती. देशाच्या पंतप्रधानांनी एखादे गाव दत्तक घेऊनही जर त्या गावाचा कायापालट होत नसेल तर पुढील दहा वर्षांत ही गावाची प्रगती होणार नाही. मोदी सरकारने फक्त गावांची जाहिरातबाजी केली. परंतु, गावे जशी होती तशीच आहेत. ज्यांना दत्तक घेतले जाते, त्यांना अनाथ करून सोडून देणे ही चांगली गोष्ट नाही, असाही आरोप अखिलेश यादव यांनी सरकारवर केला.

लोकसभेत अखिलेश यादव यांनी अग्निवीर योजनेवरही टीका केली. ”सरकारने तरुणांना नोकऱ्यांपासून दूर ठेवले आहे. युवकांकडून रोजगार हिसकावून घेण्याचे काम सरकार करत आहे. आरक्षणाचा एवढा खेळ कोणत्याही सरकारने केला नव्हता, जेवढा या सरकारने केला आहे. सरकारला नोकऱ्या द्यायच्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आरक्षणाचा खेळ केलाय. म्हणूनच लोकांना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला जात नाही, असे लोकसभेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला