उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. अजित पवार यांनी पुण्यातील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन टाळलं आहे. अजित पवार या पूर्वनियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. इतकंच नाही तर दिवसभरातील दौराही रद्द केला असल्याची माहिती आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. याचं कारण अजित पवार याआधी काही वेळा नॉट रिचेबल झाले होते. पक्षांतर्गंत बंड पुकारण्याआधीही अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. यामुळेच पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप तर येणार नाही ना अशी चर्चा रंगली आहे.