ऐनपूर महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा

राजेंद्र महाले

रावेर प्रतिनिधी– रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने हे होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील प्रा.डॉ. डी.बी.पाटील उपस्थित होते. प्रा.डॉ.डी.बी.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्राहक दिवसा बद्दल सविस्तर माहिती दिली. २४ डिसेंबर १९८६ या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींनी ग्राहक कायद्याला मंजुरी दिली. म्हणून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक भारतीयाला ग्राहक संरक्षण कायद्यानुसार सहा हक्क मिळालेले आहेत. त्यात सुरक्षेचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क व ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार यांचा समावेश होतो असे त्यांनी सांगितले. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईट वर ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास आपण ग्राहक हक्क कायद्या अंतर्गत तक्रार करू शकतो असेही ते म्हणाले. ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तू किंवा सेवांमध्ये काही त्रुटी असल्यास ग्राहकांनी तक्रार कुठे करावी, कशी करावी, त्याची पद्धत काय असते या बद्दल जागरूक राहायला पाहिजे. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी हा कायदा अंमलात आलेला आहे तसेच कोणताही ग्राहक कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक व्यवहाराची तक्रार या कायद्या अंतर्गत करू शकतो असे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.पी.नेहेते यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. एस.एन.वैष्णव, व्ही.एन. रामटेके, डॉ. पी. आर. गवळी, प्रा.दिलीप सोनवणे सह सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला एकूण ७२ रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला