आपबिती..मी ४० वर्षांपासुन फटाके उडविलेले नाहित,फटाक्यांमुळे शरिरावर होतात अनिष्ट परिणाम..सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती

चोपडा (प्रतिनिधी):- सध्या दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. दिवाळीच्या वेळेस व इतर विशेष कार्यक्रमात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होत असते. खास करून दिवाळीत रात्री अपरात्री फटाक्यांचे मोठमोठे आवाज होतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण तर होतेच पण रात्रीची झोपही होत नसते. ध्वनीप्रदूषणाचे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने फटाक्यांमुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होताना दिसत आहेत. “फटाके वाजवू नका असे सांगितले जाते, पण फटाके विकू नका किंवा फटाके फोडु नका” असे कुणी सांगत नाही. दिवाळी सणांत फटाके उडवल्याने भारतात दरवर्षी पाच हजारांपेक्षाही जास्त व्यक्ती अंध होतात. त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त व्यक्ती बालक व तरुण असतात. जगात दरवर्षी फटाके व शोभेच्या दारूमुळे पाच लाखांपेक्षाही जास्त लोक अंध होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. म्हणुनच “मी साधारणत: १३..१४ वर्षांचा असेल तेव्हा दिवाळीत फुलबाजीने कोठी लावतांना त्याचा स्फोट झाला होता. मी लांब होतो म्हणुन त्या स्फोटातुन थोडक्यात बचावलो होतो.माझ्या उजव्या हाताची पाचही बोटे पुर्ण भाजली होती. कुणालाच न सांगता मी थंड पाण्यात हात बुडवुन बसलो होतो.थोड्या वेळाने हात पुर्ण सुजून त्यावर मोठमोठे फोडही आलेले होते. स्थानिक डॉक्टरांनी तात्पुरते उपचार केलेत.पण दुसऱ्या दिवशी मला चोपडा येथील जुना सरकारी दवाखान्यात भरती करावे लागले होते.पंधरा दिवस दवाखान्यात होतो.तरिही सहा महिन्यांपर्यंत हातावर जखमेचे व्रण दिसत होते. तेव्हापासुन आजतागायत सुमारे ४० वर्षे झाली असतील मी फटाके फोडलेले नाहित की उडविलेले नाहित,” अशी आपबिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी सांगीतली आहे.

हे विषारी फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना त्याचा जास्त त्रास होत असतो. त्याच्या स्फोटामुळे बारीक माती व दगड खडे डोळ्यात जाऊन इजा होते. या फटाक्यांमधील गंध व इतर रासायनिक घटक डोळ्यांसाठी घातक असतात. फटाक्यांमुळे बहिरेपणा, अंधपणा, अंग भाजणे, इजा होणे हे तर होतेच पण कारखाने व दुकानातील स्फोटांमुळे अनेकांचे मृत्यूही झालेले आहेत. फटाक्यातून निघणाऱ्या धुरामुळे डोळे, फुफ्फुसे, त्वचा खराब होते. काहींना त्याची ऍलर्जी असल्याने दमाही होतो. तसेच फटाक्यांमुळे ध्वनी जल जमीन वायू दूषित होऊन त्याचा जीवसृष्टीवर अनिष्ट परिणाम होत असतो. ज्या ठिकाणी फटाके फोडले जातात त्या ठिकाणचे तापमान ४०० ते ६०० पर्यंत वाढुन तेथील शांतीही भंग पावलेली असते. व पैशांचाही अपव्यव होत असतो. काही राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी आहे. परंतु ते जर शक्य नसेल तर अशा वेळेस ध्वनी वायु प्रदूषणाचे कायदे कडक करणे गरजेचे आहे, अशी स्पष्टोक्ती चोपडा मार्केट कमेटिचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बुद्रूक) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं